राज्यात सत्तांतर होवून जवळपास एक महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे नियमित पावसाळी अधिवेशन घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती अर्थात बीएसीची बैठक उद्या बोलाविण्यात …
Read More »राष्ट्रवादीचा मोदींना सवाल; उत्पन्नाचे सोडा, महागाईमुळे त्या गोष्टीही मिळेना शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरून साधला निशाणा
येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहिर आश्वासन दिले. मात्र आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्याबाजूला २०२२ मधील ६ महिने संपलेली असतानाही यातील …
Read More »जयंत पाटील म्हणाले, मला कळत नाही अशा बातम्या बाहेर कशा येतात अलिप्त राहिलेले जयंत पाटील झाले पुन्हा सक्रिय
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गायब झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून ते …
Read More »शिंदे समर्थक आमदारांच्या त्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रेंडशिप डे… उध्दव ठाकरेंबरोबर मैत्री होणार का? यावर बोलणे टाळले
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर सुरुवातीला उध्दव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणाऱ्या या बंडखोरांनी नंतरच्या कालावधीत मात्र उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र आज नेमके फ्रेंडशिप डे चे औचित्य साधत एकनाथ शिंदे …
Read More »नीति आयोगाच्या बैठकीत काय झाली चर्चा? मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली ‘ही’ माहिती महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर
पीक विविधीकरण, सिंचन व्यवस्था बळकटीकरण,शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा भर असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीति आयोगाच्या बैठकीत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या’ सातव्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे …
Read More »दिल्लीत शेवटच्या रांगेत मुख्यमंत्री शिंदे; रोहित पवार म्हणाले, हा मराठीजनांचा अपमान… नीती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटोसेशनमध्ये शिंदेंना शेवटचे स्थान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गर्व्हिनिंग कौन्सिलची बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर झालेल्या फोटोसेशनवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला उपस्थित राहीलेल्या ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपा आणि पंतप्रधान मोदी …
Read More »उदय सामंत यांचे हल्लेखोरांना आव्हान, तारीख आणि वार देतो… पुण्यातील हल्ल्यानंतर जाहिर सभा घेणार असल्याचे केले जाहिर
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या भागात जाणाऱ्या माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यानंतर सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरही सदर घटनेची माहिती घातली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अंगावर आले तर शिंगावर घ्या असा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर उदय सामंत …
Read More »उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले, उत्तर द्यायला मी रिकामटेकडा नाही उध्दव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावरून व्यक्त केली प्रतिक्रिया
राज्यात विरोधी पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस हे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देत असत. तसेच राऊत हे काही सर्वज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करणार नसल्याचे सातत्याने सांगत होते. मात्र आता एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी काही जणांकडून करण्यात …
Read More »संभाजी राजे भडकले अन् म्हणाले, पहिले अबू आझमीला बाहेर फेकलं पाहिजे औरंगजेबावरील वक्तव्यावरून संभाजी राजे भडकले
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ केले. त्यानंतर सत्तांतर होत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही हा निर्णय कायम ठेवला. मात्र या नामांतरावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेल असतानाच समाजवादी पार्टीचे नेते अबू …
Read More »भाजपा आमदार जयकुमार गोरे अखेर न्यायालयात शरण मृत व्यक्तीला जीवंत असल्याचे दाखवित जमिन खरेदीची खोटी कागदपत्रे तयार केल्याचे प्रकरण
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी गावातील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यत धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा न दिल्याने आज अखेर जिल्हा न्यालयात शरण आले. यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी …
Read More »
Marathi e-Batmya