प. बंगालमध्ये ज्या पद्धतीने चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या कारनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे परंतु सत्यपरिस्थिती माहीत असतानाही भाजपने जो रडीचा डाव सुरू केलाय त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

About Editor

Check Also

संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *