आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे उतरणार कोकणातील खळ्यात

सध्या देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकापैंकी दोन राज्यातील विधानसभेच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. तर दोन राज्यातील निवडणूकाांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीला वेग दिला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लोकसभेच्या निवडणूकांसोबत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्यापासून दोन दिवस कोकणच्या खळ्यात उतरणार असल्याची माहिती पुढे आली.

खळा बैठक ही एक आगळीवेगळी संकल्पना आहे. कोकणातील खळा हा घराशी निगडित अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार असतो. त्याच खळ्यामध्ये गुरूवार २३ नोव्हेंबर आणि शुक्रवार २४ नोव्हेंबर असे दोन दिवस आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे हे आपल्या घरी येऊन आपल्याशी संवाद साधणार असल्याने कोकणातील शिवसैनिकांमध्ये चैत्यन्यांचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी होणारा हा संवाद महत्वाचा ठरणार आहे. स्थानिक प्रश्नांबद्दलही यावेळी चर्चा होऊ शकते. कोकणभूमी ही सुरूवातीपासूनच शिवसेनेच्या सोबत राहिली आहे. दोडा मार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, खेड, महाड, नागोठणे आदी ठिकाणी या खळा बैठका होणार आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुल राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *