दोन वर्षात ७२ हजार जणांना सरकारी नोकऱ्या देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यातील ३६ हजार जागा यावर्षी तर राहीलेल्या ३६ हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

राज्य सरकारकडून कृषी विभाग २ हजार ५७२, पशु व दुग्धसंवर्धन विभागातील १ हजार ४७, मत्सव्यवसाय विभाग ९०, ग्रामविकास विभाग ११ हजार ५, गृह विभाग ७ हजार १११,  सार्वजनिक बांधकांम विभाग ८ हजार ३३७, जलसंपदा विभाग ८ हजार २२७, जलसंधारण विभाग ४ हजार २२३, सार्वजनिक आरोग्य विभाग१ हजार आणि नगरविकास विभागाच्या १ हजार ५०० जागा अशा मिळून एकूण ३६ हजार रिक्त जागा यावर्षी तर दोन वर्षात मिळून ७२ हजार जागा भरणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

About Editor

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *