कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच मुख्यमंत्री अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून

मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी अडीच वर्षे सिद्धरामय्या तर अडीच वर्षे डी के शिवकुमार हे राहतील अशी चर्चा कर्नाटकातील निवडणूकीनंतर सुरु झाली होती. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अडीच वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांना बदलण्याचे संकेत काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडून देण्यात येत असताना कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी (२ जुलै २०२५) सांगितले की, ते पूर्ण पाच वर्षांसाठी पदावर राहतील. “हो, मी असेन. तुम्हाला शंका का आहे?” असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील सत्ता वाटप कराराचा हवाला देत, या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री बदलाबाबत राजकीय वर्तुळात, विशेषतः सत्ताधारी काँग्रेसमध्ये, काही काळापासून अटकळ बांधली जात आहे.

तथापि, डी के शिवकुमार यांनी १ जुलै रोजी सांगितले की, नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील पक्षाच्या सरकारचे हात मजबूत करण्यावर भर दिला.

भाजपा आणि जेडी(एस) नेत्यांनी मुख्यमंत्री बदलले जातील या दाव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले, “ते आमचे हायकमांड आहेत का?”

“आर. अशोक (विधानसभेतील विरोधी पक्षनेते) हे भाजपाचे आहेत. बी.वाय. विजयेंद्र (राज्य भाजप अध्यक्ष) हे भाजपाचे आहेत. चालवाडी नारायणस्वामी (विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते) हे भाजपाचे आहेत. ते असे बोलतात का ते तुम्ही लिहाल का? तुम्ही पडताळून पहावे की नाही?” त्यांनी विचारले.

तत्पूर्वी, बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना डी के शिवकुमार यांनी असे सांगितले की, सत्ताधारी काँग्रेसमध्ये कोणताही असंतोष नाही आणि जेव्हा सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून असतात तेव्हा नेतृत्वाच्या मुद्द्यावर कोणत्याही मतभेदाची आवश्यकता नाही.

मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी  सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा होती आणि काँग्रेसने त्यांना पटवून देऊन उपमुख्यमंत्री बनवले होते.

त्यावेळी काही वृत्ते आली होती की “रोटेशनल मुख्यमंत्री सूत्र” नुसार तडजोड झाली आहे, त्यानुसार शिवकुमार अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होतील, परंतु पक्षाने त्यांना अधिकृतपणे पुष्टी दिलेली नाही.

About Editor

Check Also

कॉकरोच जनता पार्टीत टीएमसीच्या दोन खासदारांनी केला प्रवेश, दोन दिवसात ४० हजार सदस्य सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्याच्या नावावरून राजकिय पक्षाचे नाव

“धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी.” हे झुरळ जनता पक्षाचे (CJP) ब्रीदवाक्य आहे. हा भारतातील एक नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *