अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींना उद्देशून म्हणाले, सर्वात छान दिसणारा माणूस भारत-पाक युद्ध थांबविण्यासाठी व्यापार दबावाचा वापर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांना “सर्वात छान दिसणारा माणूस” असे संबोधले, तसेच या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय पुन्हा एकदा त्यांनी घेतले.

दक्षिण कोरियामध्ये आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपेक) च्या व्यावसायिक नेत्यांसाठी आयोजित भोजन समारंभात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यातील त्यांच्या घटनांची आठवण करून दिली आणि सांगितले की, त्यांनी दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील संभाव्य युद्ध थांबवण्यासाठी “व्यापार दबावाचा वापर” केला होता.

“दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रे एकमेकांशी लढत होती. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, नाही, नाही, नाही, तुम्ही आम्हाला लढू द्या. ते बलवान लोक आहेत. पंतप्रधान मोदी हे सर्वात छान दिसणारा माणूस आहे. तो एक खूनी आहे. तो नरकासारखा कठोर आहे. पण थोड्या वेळाने त्यांनी फोन केला आणि सांगितले की, आम्ही लढाई थांबवू, असेही यावेळी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, लवकरच भारतासोबत व्यापार करार करण्याचे संकेतही दिले. मी भारतासोबत व्यापार करार करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रपतींनी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद या दोन्ही देशांशी असलेल्या त्यांच्या “उत्तम संबंधांचे” वर्णन केले.

पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी भारतासोबत व्यापार करार करत आहे आणि मला पंतप्रधान मोदींबद्दल प्रेम आणि आदर आहे. त्याचप्रमाणे, पाकिस्तानचे पंतप्रधान एक महान माणूस आहेत आणि त्यांचे फील्ड मार्शल एक महान लढाऊ आहेत, दोन्ही नेत्यांना सांगितले होते की दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू असताना अमेरिका त्यांच्याशी व्यापार करार करणार नाही असल्याचे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितले की, तुम्ही पाकिस्तानशी लढत असल्याने आम्ही तुमच्याशी व्यापार करार करू शकत नाही. त्यानंतर मी पाकिस्तानला फोन केला आणि तेच सांगितले, असेही यावेळी स्पष्ट केले.

या वर्षी मे महिन्यात झालेल्या एका छोट्या लष्करी संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करताना ट्रम्प यांनी भूतकाळात असेच दावे केले आहेत, हा दावा नवी दिल्लीने स्पष्टपणे नाकारला आहे आणि पुनरुच्चार केला आहे की दोन्ही देशांमधील युद्धबंदी तिसऱ्या पक्षाच्या सहभागाशिवाय द्विपक्षीय पद्धतीने झाली होती.

About Editor

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *