Tag Archives: इंडिया आघाडी

अखिलेश यादव यांचा ओम बिर्लांना खोचक शुभेच्छा, सभागृह तुम्ही चालवावे, पण उलट घडू नये लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन विराजमान केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शुभेच्छा पर भाषण देताना लोकसभा …

Read More »

लोकसभा अध्यक्ष पदी विराजमान होताच ओम बिर्लांकडून आणीबाणी विरोधात ठराव विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

१८ व्या लोकसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले. या आवाजी मतदानात भाजपाचे खासदार तथा माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विजय झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांच्या बाकाजवळ जात त्यांना अध्यक्ष पदाच्या …

Read More »

अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे के सुरेश लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावरून तिढा कायम बऱ्याच वर्षानंतर पदासाठी निवडणूक

काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला लोकसभा सभागृहाचे उपाध्यक्ष पद देण्याची तयारी दर्शविली तर सत्ताधारी भाजपा प्रणित एनडीए सरकारच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारा पाठिंबा देण्याची तयारी इंडिया आघाडीने दाखविली होती. मात्र भाजपा प्रणित एनडीएने उपाध्यक्ष पद देण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इंडिया आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी के सुरेश यांना उमेदवारी जाहिर केली. तर भाजपाकडून अध्यक्ष …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा

केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …

Read More »

संसद अधिवेशनाला सुरुवात, खासदारांचा शपथविधी, इंडिया आघाडीचा विरोध इंडिया आघाडीकडून संसदेच्या प्रांगणात राज्यघटनेची प्रत घेऊन निदर्शने

केंद्रातील एनडीए सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी अधिवेशाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर औपचारिक मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या खासदारांचा पहिल्यांदा शपथविधी पार पडला. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खाजदारकीची शपथ …

Read More »

लोकसभेचे उपसभापती पद न दिल्यास इंडिया आघाडी निवडणूक लढविणार एनडीए सरकारवर दबाव आणण्यासाठी आघाडीची रणनीती

लोकसभा निवडणूकीत एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर आता बहुमत सिध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून पावसाळी अधिवेशन बोलावले असून या पावसाळी अधिवेशनातच सभापती आणि लोकसभेच्या उपसभापती पदावरील निवड करण्यात येणार आहे. परंपरेने सभापती पदावर केंद्रातील सरकारकडे असते, तर उपसभापती विरोधी पक्षांना देण्यात येते. मात्र जर उपसभापती …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, त्यांना केवळ बहुजनांची मते हवीत इंडिया आघाडीवर साधला निशाणा

त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी सर्वांत …

Read More »

संजय राऊत म्हणाले, चंद्राबाबू – नितीशकुमार आज त्यांच्यासोबत तर उद्या आमच्यासोबत एनडीएसोबत सरकारमध्ये सामील होण्यावरून संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र

लोकसभा निवडणूकीनंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपा आणि एनडीएच्या खासदारांची आज संसदेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत एनडीएचे लोकसभेतील सभागृह नेते म्हणून खासदार नरेंद्र मोदी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, टीडीपी- जेडीयूशी संपर्क साधण्याबाबत कोणतीही चर्चा नाही इंडिया आघाडीकडून अद्याप सरकार स्थापनेबाबत चर्चा नाही

लोकसभा निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या निकालाने एनडीएला बहुमत दिलेले असले तरी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर संपूर्ण इंडिया आघाडीला २३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दोन-तीन मित्र पक्षांची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या …

Read More »

एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर भाजपाबाबत अपेक्षा वाढवून ठेवल्याने शेअर बाजार ६ हजार अंशाने गडगडला

बीएसई सेन्सेक्सने त्याची घसरण ६,१०० अंकांपर्यंत वाढवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदार खचले आहेत. गुंतवणूकदारांना भीती वाटते की भाजपा २७२ चे स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरू शकते आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आल्यास राजकीय प्रभाव सोडावा लागेल. टीम NDA सध्या २९७ जागांसह आघाडीवर आहे, ३५०-अधिक जागा जिंकण्यापेक्षा खूपच कमी, काही प्रकरणांमध्ये ४००-अधिक, एका …

Read More »