Tag Archives: काँग्रेस

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री …

Read More »

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप, भारतीय परराष्ट्र धोरणाला तिसरा धक्का अमेरिकेचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना जेवणाचे आमंत्रण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित करणार असल्याचे वृत्त पुढे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत म्हटले की, हा भारतीय परराष्ट्र धोरणासाठी “तिहेरी धक्का” आहे आणि “आता अमेरिकेशी व्यवहार करणे देखील आपल्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे” असल्याची भीतीही …

Read More »

कर्नाटक सरकारकडूनही कामगार कायद्यात बदलः कामाचे तास १० तास आंध्र प्रदेशनंतर आता कर्नाटक राज्याकडूनही कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी

कर्नाटक सरकारने कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक स्थापना कायदा, १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे दैनंदिन कामकाजाचे तास सध्याच्या नऊ तासांवरून १० पर्यंत वाढवले ​​जातील आणि ओव्हरटाइम तासांना परवानगी दिली जाईल. कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक स्थापना कायदा, १९६१ हा राज्यातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे तास आणि कामगार परिस्थिती …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश का? शिवसेना उबाठाचे सुधाकर बडगुजर यांच्या भाजपाच्या प्रवेशावर केली टीका

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, इंद्रायणी नदीवरील पूल प्रकरणी मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला?

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ …

Read More »

जातीय जणगणनेची अखेर तारीख ठरली, केंद्र सरकारकडून अखेर अधिसूचना जाहिर दोन टप्प्यात होणार जनगणना

मागील वर्षी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकार आणि भाजपाला ठणकावून सांगत आम्ही याच सभागृहात जातीय जणगणना करायला भाग पाडू असे आव्हान दिले. त्यानंतर अधिवेशानंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातीय जणगणना करणार असल्याची घोषणा केली. परंतु आता बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या शेतकरी कर्जमाफीवरील भाजपाच्या नेत्यांची विधाने जखमेवर मीठ चोळणारी

राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, फडणवीस, शिंदे, पवार ……महागात पडेल कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी …

Read More »

काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदारसंख्या वाढली असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करत ही विधानसभा निवडणूक एकप्रकारची मॅच फिक्सिंग होती असा आरोप केला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मात्र काँग्रेसच्या निवडणूक आयोगावरील आरोपाला भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मोदी व फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले, मोदी तर सत्ताभोगी अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने …

Read More »