Tag Archives: काँग्रेस

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना सभ्यता, संस्कृती व लोकशाहीची मुल्ये जोपासलेल्या सिंधुदुर्गात आता ‘हम करो सो कायदा’ म्हणणारे लोक

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक …

Read More »

मतदार याद्यांमधील घोळ: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बोलावली बैठक मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याचा विचार

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ झाल्याचे किंवा मतदारांची संख्या अचानक वाढल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रश्नी लोकसभेत चर्चेची मागणी केली. त्यास विरोधकांमधील सर्वच राजकिय पक्षांनी यासंदर्भात पाठिंबा दर्शविला. तर काही ठिकाणी मतांच्या संख्येवरून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च …

Read More »

पेपर फुटीवरून राहुल गांधी यांची टीका, ८५ लाख विद्यार्थी पद्मव्यूहात व्यवस्थात्मक अपयश असल्याची केली टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात पेपरफुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी ही “व्यवस्थात्मक अपयश” असल्याचे म्हटले आहे. सहा राज्यांमध्ये पेपरफुटीच्या नव्या लाटेदरम्यान गुरुवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये गांधींनी या समस्येवर “एकत्रित राजकीय प्रतिसाद” देण्याचे आवाहन केले आहे. “६ राज्यांमधील ८५ …

Read More »

अश्विनी वैष्णव यांचे स्टारलिंकचे आधी स्वागत करणारे ट्विट नंतर मात्र ट्विटच डिलीट काँग्रेसकडून ट्विट डिलीटवर टीकास्त्र

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्टारलिंकचे भारतात स्वागत करणारे ट्विट डिलीट केल्याने विरोधी पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एअरटेल आणि जिओने करारांवर स्वाक्षरी करण्याची घोषणा केल्यानंतर वैष्णव यांनी एलोन मस्कच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स कडे त्यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवेचे भारतात स्वागत केले. तथापि, मंत्र्यांनी ट्विट डिलीट केले, ज्यामुळे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, युवा शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा सरकारने घेतलेला बळी नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, चामड्याच्या वस्तूंवरील अन्यायकारक जीएसटी तात्काळ कमी करा लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली मागणी

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या महागाई व नोटबंदीने लघु, छोटे व मध्यम व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, त्यातच जीएसटीमुळे उरला सुरला उद्योगही शेवटच्या घटका मोजत आहे. सर्वच वस्तूवर जीएसटी लावून सरकार छोटे उद्योग देशोधडीला लावत आहे. चामड्याच्या वस्तूंवर जीएसटी वाढवून भाजपा सरकाने या उद्योगाला मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने हा वाढवलेला जीएसटी तात्काळ …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त …

Read More »

शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार

आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …

Read More »

शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, समर्थनार्थ मोठा मेळावा होणार विरोधी पक्षननेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

राज्यातील देवस्थानांना जोडणारे रस्ते आधीच चांगल्या आणि सुस्थितीत असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्गमार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग मोठ्या प्रमाणावर रेटला जात आहे. आजच्या मोर्चात फक्त कोल्हापूरचे शेतकरी आले आहेत. मात्र भविष्यकाळात …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला तंबी द्या मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?

कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …

Read More »