Tag Archives: कृषी मंत्री

दत्तात्रय भरणे यांचा निर्धार, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी शासन प्रयत्नशील राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार

“कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. तसेच नैसर्गिक संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी या कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे निर्देश …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आदेश एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा

जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात २ लाख ५४ हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७  एकर क्षेत्र बाधित आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. सप्टेंबर पूर्वीचा विचार केला तर नुकसान थोडं कमी …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्यातील बांधावर जात केली बाधित क्षेत्राची पाहणी पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी मंजूर

“अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यात पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतक-यांना मंजूर झाला आहे. मंजूर केलेला निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात …

Read More »

युरियासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र रब्बीसाठी १२ लाख मॅट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचीही मागणी

महाराष्ट्रात २०२५ रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहीत राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ २.३६ लाख मॅट्रिक …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, ऑगस्ट, सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान राज्यातील १७,८५,७१४ हेक्टर क्षेत्र बाधित

“ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना …

Read More »

महाराष्ट्रात मान्सून अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेती पिकांचे नुकसान राज्यातील १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसताना दिसतोय.अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचा विश्वास, जीएसटी कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना कररचनेतील कपात, मध्यस्थांवरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल

शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी जीएसटी परिषदेने कृषी यंत्रसामग्री, साधने खते व बियाणे अशा विविध गोष्टींवरील कर कपात करत शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी दिली आहे. कररचनेतील कपात, मध्यस्थांवरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला या निर्णयामुळे चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे …

Read More »

अजित पवार यांची माहिती, शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल, असे …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे २३.१४ लाख एकर शेती बाधित मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठ्या नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २३ लाख १४ हजार ०५७.५ एकर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नुकसान भरपाईवर राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते. राज्याचे कृषीमंत्री …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यात अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टर पीकांचे नुकसान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने मदत करणार

राज्यात ९ ऑगस्टपासून आजपर्यंत १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात ८ लाखांपेक्षा जास्त हेक्टर पीकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …

Read More »