Tag Archives: जिल्हाधिकारी

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आदेश, बाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर अहवाल सादर करा १५ जुलै पर्यंत आढावा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अध्यक्ष यांना बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन १५ जुलै, २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बाल हक्क संरक्षण आयोगाने स्पष्ट केले आहे …

Read More »

जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, आरडीसींच्या अधिकारांचे ‘नवे’ वाटप जाहीर बारा वर्षांनंतर महसूल विभागात विषय बदल

राज्यातील महसूल प्रशासनाला अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीसह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारी व अधिकारात मोठे फेरबदल करण्याचा धडाकेबाज निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. प्रशासकीय कार्यपद्धतीत झालेल्या कालानुरूप बदलाचा विचार करून अधिकार व कामकाजाचे सुधारित व सुसंगत वाटप करण्यात आले आहे. तब्बल बारा वर्षांनंतर हा व्यापक निर्णय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना २०२५’ राबविण्यात येत आहे. १५४ सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत केली जाणार आहे. यात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘चिंतन शिबिर’ आणि विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. …

Read More »

शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले पूर परिस्थितीत नागरिकांना मदतीच्या नावाखाली गेल्या अन् जिल्हाधिकाऱ्यांकडूनच शहाणपण शिकल्या

सोलापूर येथील सीना नदीला पूर आल्याने माढा, मोहोळ, उत्तर  सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा चांगलाच फटका बसला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून ज्योती वाघमारे यांनी थेट …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका, आग लगे बस्ती में, हम हमारे मस्ती में… नवरात्रीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्याने केला डान्स

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शेतात पाणी घरा दारात पाणी संसार वाहुन गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात असताना तेथील जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नवरात्रीच्या कार्यक्रमात नाचत आहेत, प्रशासनाला आणि राजकर्त्यांना याचं गांभिर्य नाही अशी घणाघाती …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आदेश, १५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करा जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी

ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा तीव्र आहे त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा असे निर्देश देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तात्काळ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी

तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय …

Read More »

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ४०६६ नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांची माहिती

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी ४०६६ नव्या आधार किटचे वाटप १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज दिली आशिष शेलार यांनी पुढे बोलताना म्हणाले की, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, अशा विविध सेवा देणारी …

Read More »

काँग्रेस मागणार खर्चाचा हिशेब, महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला? काय कामे झाली? हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक-यांना विचारणार

महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नात आघडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळाच देशात सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पीछेहाट झाली असून राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. कॅगनेही राज्य सरकारच्या आर्थिक …

Read More »

त्या तलाठ्याच्या नियमबाह्य कृतीवरून मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी

नुकतेच राज्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी तलाठ्याकडून एका महिलेकडून रोख रक्कम घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब कसा केला जातो याचे प्रात्यक्षिकच या निमित्ताने राज्यातील जनतेला पाह्यला मिळालेले असतानाच या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील …

Read More »