महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील एसआयआरचे वेळापत्रक जाहिर १६ राज्ये ३ केंद्र शासित राज्यांंसह महाराष्ट्रात एसआरआऱचे वेळापत्रक प्रसिद्ध
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात …
Read More »विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी डॉ प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या नऊ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, मतदार याद्यांमधील घोळ दूर करुन निवडणुका घ्या महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, दिल्लीला जात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून शून्य कारवाई, निवडणूक आयोग झोपेचे सोंग घेत आहे.
भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या सहभागाने निवडणूक आयोगाची मतचोरी हरियाणात विधानसभा निवडणूकीत लोकशाही संपविण्यासाठीच केली मतचोरी
निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी भागीदारी करत लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न हरियाणा विधानसभा निवडणुकीत मत चोरी करून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणामध्ये “ऑपरेशन सरकार चोरी” सुरू करण्यात आले. सर्व एक्झिट पोल …
Read More »सत्याचा मोर्चा शरद पवार इशारा, मतदानाचा अधिकार टीकवायचा असेल तर… मतभेद विसरून एकत्र यावं लागेल
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत ९९ लाख मतदार वाढले. तसेच अनेक ठिकाणी दुबार नावांच्या माध्यमातून मत चोरी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आदी राजकीय पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात …
Read More »राज ठाकरे यांचे सत्याचा मोर्चावेळी आदेश, दुबारवाले दिसले की त्यांना फटकावा आणि मगच… नोंदणीकृत मतदारांपेक्षा दुबार वाल्यांची नावे सर्वाधिक
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरला मोर्चा
मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »
Marathi e-Batmya