Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींची निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेकाफेकी लाखो रोजगार निर्मिती होत असेल तर अजूनही बेरोजगारांच्या फौजा कशा

मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा दावा, देशात ३ ते ४ वर्षात आठ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या नेस्कोच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान मोदीचे वक्तव्य

रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने …

Read More »

नाना पटोले यांची टीका, कॅगने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांचा फुगा फोडला विरोधकांच्या आक्षेपावर कॅगकडूनही शिक्कामोर्तब

महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे …

Read More »

कापसाचे हेक्टरी उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे मत

तीन हजार वर्षांपूर्वी भारताने वस्त्राद्योगाचे ज्ञान जगाला दिले. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी कापसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल, राही सरनोबत आणि शहीद सूद वर सरकारकडून अन्याय का ? सुवर्ण पदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या, शहीद सूद कुंटुबियांना मदत करा

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, थकित वीज बील माफ करा शेतकऱ्यांसाठी मदतीचा आव हे महायुतीचे फेक नॅरेटीव्ह

केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी अनिल अंबानींच्या कर्जमाफीसाठी १७०० कोटी आणि ‘लाडकी बहिण’ला मात्र फक्त १५०० रुपये!

राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्या वांद्र वर्सोवा कोस्टल रोडप्रकरणी आयोजित बैठकीत दिले निर्देश

वांद्रे – वर्सोवा कोस्टल रोडच्या कामामध्ये एक कनेक्टर गजधर बांध, सांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी येणार आहे. हा कनेक्टर जेथे उतरणार आहे तेथील पुलाच्या खालील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना नागरिकांना समस्या जाणवणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे वांद्रे क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

शंभुराज देसाई यांचा आरोप, शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक अनुपस्थितीत

मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. या बैठकीला अनुपस्थित राहून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा, सामाजिक तेढ निर्माण करण्याला अधिक खतपाणी घालायचे असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, … मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही? आरक्षण प्रश्नावरील स्वतःचे पाप लपवण्यासाठी महायुती सरकारकडून राजकारण

सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मराठा आरक्षण प्रश्नावर गुलाल उधळला तो कशासाठी, असा सवाल उपस्थित करून सरकारचा एक मंत्री ओबीसी आंदोलनात जाऊन जाहीरपणे विरोधी भूमिका घेतो. सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावर …

Read More »