वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात त्यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबियांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. …
Read More »काँग्रेसची केंद्राकडे मागणी, डॉ मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अत्यंविधीसाठी वेगळी जागा द्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय केंद्र सरकारला लिहिले पत्र
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यविधी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर, जिथे अनेक माजी पंतप्रधानांचे स्मारक आहेत, तेथे वेगळी जमिन मिळावी यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहीत मागणी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सूत्रांनी सांगितले. …
Read More »नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्पावर विशेष लक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पदभारानंतर माहिती
देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी,वाचन चळवळ वाढविणे आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उच्च व …
Read More »१०० दिवसांच्या आराखड्याबाबत अधिकारीच गोंधळात तर मुख्यमंत्री म्हणतात ठोस कामगिरी करा लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
साधारणतः मुंबईतील राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या राज्य सरकारचे विशेष अधिवेशन पार पडले या अधिवेशनात सरकार स्थापनेनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेच आठच दिवसात नागपूरात हिवाळी अधिवेशन पार पडले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या प्रशासनात महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि १०० दिवसाचा कार्यक्रम जाहिर तयार …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.
परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुती? चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत स्थानिक नेतृत्वच घेणार निर्णय
लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणूकांची तयारी जोरात सुरु केली. तसेच महिला मतदारांना आकर्षित करणाऱ्या विविध योजनाही यावेळी जाहिर केल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देणाऱ्या मासिक हप्त्यातही वाढ करत शेतकऱ्यांची फार काळजी करत असल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत भाजपा आणि महायुतीच्या विरोधात वातावरण असतानाही भाजपा महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या …
Read More »आरएसएसशी बिघडलेले संबध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून ख्रिसमस गोवा, केरळ आणि ईशान्य भारतातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील मुख्यालयात ख्रिसमस सेलिब्रेशनच्या कार्यक्रमात ख्रिश्चन समुदायाच्या कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ला केलेले संबोधन लक्षणीय आहे. जर्मनीतील अलीकडील ख्रिसमस मार्केट हल्ल्याचा आणि श्रीलंकेतील २०१९ च्या इस्टर बॉम्बस्फोटांचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाचा वापर केला आणि “सबका साथ, सबका विकास” ही त्यांची घोषणा ख्रिश्चन …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केन बेतवा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी वाघांच्या जंगलातून जात धरणाचे काम, काँग्रेसची टीका
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …
Read More »निवडणूक नियमात बदल काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव नागरिकांचे अधिकार कमी करण्यासाठीच हा बदल केल्याचा काँग्रेसचा आरोप
काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारने निवडणूक घेण्याविषयीचा नियम, १९६१ मधील नुकत्याच केलेल्या सुधारणांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्याद्वारे निवडणूक संबंधित नोंदींमध्ये प्रवेश करण्याचे नागरिकांचे अधिकार कमी केले गेले आहेत असा आरोपही यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. याचिकेनुसार, निवडणूक आयोग, जी एक संवैधानिक संस्था आहे, ज्यावर मुक्त आणि निष्पक्ष …
Read More »नो बॅनर साठी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध
२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आदित्य ठाकरे पुढे लिहिलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya