पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, सभ्य भाषणे देणारे राजकारणी काही काळासाठी प्रासंगिक… एका पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीत केले वक्तव्य

सभ्य भाषणे देणारे काही व्यावसायिक राजकारणी हे काही काळासाठी प्रासंगिक राहु शकतात. परंतु दिर्घकाळासाठी टिकू शकत नाहीत असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सोशल मिडियावर चालविण्यात येणाऱ्या पोडकास्टला नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत उत्तर देताना ते बोलत होते.

राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकारणात प्रवेश करणे सोपे आहे, परंतु यश मिळवणे हे पूर्णपणे वेगळे आव्हान आहे. यशस्वी होण्यासाठी राजकारणी व्यक्तीमध्ये आवश्यक असलेले आवश्यक गुण सांगताना पुढे बोलताना म्हणाले की, संवादाची शक्ती, समर्पण आणि लोकांशी जोडलेले राहणे आवश्यक आहे. ध्येय असलेले लोक यशस्वी होतात, तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात अपयशी ठरतात असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकारणात यश मिळविण्यासाठी अत्यंत समर्पण, चांगल्या आणि वाईट काळात लोकांशी सतत संबंध आणि संघ खेळाडू म्हणून काम करण्याची क्षमता आवश्यक असते. जर कोणी असा विश्वास ठेवत असेल की प्रत्येकजण त्यांचे ऐकेल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीचे अनुसरण करेल, तर ते चुकीचे आहे. जरी ते काही निवडणुका जिंकू शकत असले तरी, ते यशस्वी नेता म्हणून उदयास येतील याची कोणतीही हमी नाही, असेही यावेळी सांगितले.

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आव्हाने आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय परिदृश्याची तुलना करताना म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात, विविध पार्श्वभूमीतील लोकांनी भाग घेतला, विविध प्रकारे योगदान दिले. काहींनी जनतेला शिक्षित केले, काहींनी खादी बनवण्यात सहभाग घेतला आणि अनेकांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी काम केले, तसेच इतर भूमिकाही स्विकारल्या. तरीही, ते सर्व देशभक्तीच्या समान भावनेने एकत्र आल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर, यापैकी काही व्यक्ती राजकारणात आल्या, त्यांच्यासोबत अतुलनीय परिपक्वता, समर्पण आणि उद्देशाची खोलवर भावना होती. चांगल्या लोकांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे तर ध्येयाने राजकारणात येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याच्या मुद्यावरही यावेळी भर दिला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांचे उदाहरण देताना, उदाहरणार्थ, महात्मा गांधी घ्या. ते कदाचित उत्तम वक्ते नसतील, परंतु त्यांचे व्यक्तिमत्व आणि लोकांशी असलेले संबंध यांनी देशाला एकत्र आणले. गांधींनी स्वतः कधीही टोपी घातली नाही, परंतु जगाला ‘गांधी टोपी’ आठवते. हीच खऱ्या संवादाची आणि नेतृत्वाची शक्ती असल्याचेही यावेळी सांगितले.

राजकारणात येणाऱ्या तरुणांबद्दल विचारले असता पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताला देशाची सेवा करण्याच्या निःस्वार्थ इच्छेने प्रेरित एक लाख समर्पित तरुण राजकारण्यांची आवश्यकता आहे. राजकारण हे फक्त ‘लेना, पाना, और बनाना’ (घेणे, मिळवणे आणि बनविणे ) यावर अवलंबून नसावे. असा दृष्टिकोन दीर्घकाळ टिकणार नाही,” अशी स्पष्टोक्ती दिली.

पंतप्रधान मोदी यांनी उद्योजकतेची राजकारणाशी तुलना कशी करताना म्हणाले की, उद्योजक त्यांच्या कंपनीच्या वाढीसाठी आणि यशासाठी काम करतात, तर राजकारण हे मूलतः देशाला प्राधान्य देण्याबद्दल असते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधा-यांकडून ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी कामगारांना कोणाच्या दबावाखाली सोडले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *