राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा, काँग्रेसमधील वाद क्षमविण्यासाठी काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद आणि तब्येतीची तक्रार नसल्याचे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगत पुढील एक-दोन दिवसात जागा वाटपाची चर्चा होऊन उमेदवार यादी …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची घोषणा, आपल्याला संपविणाऱ्यांना संपवायचाय… अर्ज काढून घ्या म्हणलं की काढू घ्या, राखीव मतदारसंघातील आपल्या विचाराच्या उमेदवाराला मदत
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा राज्य सरकारला विविध मार्गांनी आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने दिलेली मागणी पूर्ण करत नसल्याचे दिसताच निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार आज सकाळपासून अनेक राजकिय जाणकार, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर मराठा समाजाच्या …
Read More »काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची माहिती, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, आम्ही प्रादेशिक… योग्य तो सन्मान द्यावा ही अपेक्षा
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दरम्यान झालेल्या चर्चेच्या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर मातोश्रीवरील प्रवेश सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर आम्ही बैठकीला बसणार नसल्याचे जाहिर …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर रमेश चेन्नीथला म्हणाले, मविआत मतभेद नाहीत मविआने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर ‘योजनादूत’सह सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द: नाना पटोले.
काल शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करत नाना पटोले जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर बैठकीला बसणार नसल्याचे सांगत काँग्रेसबाबत जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वादाबाबतची कल्पना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना फोनवरून दिली. …
Read More »नाना पटोले यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची नाराजी तर नाना पटोले म्हणाले ते मोठे… अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्यावर केला पलटवार
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक आयाराम गयारामांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडली आहे. आज सांगोल्याचे दिपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस …
Read More »रिपाईचा डेमोक्रेटीक टीएम कांबळे ग्रुप लढणार विधानसभेच्या १० जागा आरपीआय डेमोक्रेटीकचे कनिष्क कांबळे यांची माहिती
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदारसंघापैकी मुंबई, विदर्भासह मराठवाडयातील दहा जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी जाहिर केले आहे. पक्षाची मुंबई, विदर्भ व मराठवाडयात …
Read More »भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप
नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »भाजपाकडून या पाच ते सात आमदारांना विधानसभा निवडणूकीत नारळ राम कदम, पराग शहा, तमिल सेल्वन,भारती लव्हेकर, सनिल राणे रेड झोनमध्ये
विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून मुंबईत आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगण्यात असून मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी पाच ते सात उमेदवारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. …
Read More »प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ
सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …
Read More »बच्चू कडू यांचा सवाल, तुम्ही कसले परिवर्तन आणणार… तिसऱ्या आघाडीचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल
पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल करत तिसऱ्या आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करत परिवर्तनाचा अधिकार महायुतीला नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला …
Read More »
Marathi e-Batmya