राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी योजना राबवा कल्याण डोंबिवली परिसराची भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नियोजन करा
मुंबई, ठाण्यानंतर आता कल्याण- डोंबिवली या शहरात वेगाने विकास होत आहे. हे लक्षात घेऊन येथील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे शहराप्रमाणे सर्व योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले. तसेच भविष्यात कल्याण डोंबिवली परिसराला लागणारी पाण्याची गरज भागू शकेल याकरिता महानगरपालिका, जलसंपदा विभाग यासह …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची गद्दार, लाचारांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ द्यायची नाही
राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …
Read More »शिंदे गटाच्या राजेश शहाच्या मुलाचा प्रतापः बीएमडब्लू कारने महिलेचे प्राण घेऊन फरार पोलिसांकडून शोधाशोध सुरु केल्याची माहिती
पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पैसेवाल्या आणि सत्तेची धुंदी चढलेल्या नेत्यांच्या पोरांच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या हिट अॅण्ड रन या घटनेची भर पडली आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या पोराने मुंबई वरळी येथील एका मच्छिमार महिलेला धडक तर दिली. पण नंतर सदर महिलेच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, राज्यात महागळती सरकार घोषणाच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा मग कळेल किती अमलबजाणी किती झाली ते कळेल
राज्यातील महायुतीचे की डबल इंजिन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील प्रत्येक जण म्हणतोय या सरकारला बाय बाय करायची वेळ आली आहे. मात्र मी म्हणेन की राज्यातील हे महागळती-लिकेज सरकार आहे अशी खोचक टीका शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत या सरकारच्या काळात पेपर फुटी झाल्या …
Read More »संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …
Read More »शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद
लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी,… शैक्षणिक आराखड्याच्या अभिप्रायसाठी मुदत वाढ दया शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे लेखी पत्राद्वारे केली मागणी
राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी व परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन …
Read More »अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार
मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …
Read More »
Marathi e-Batmya