Tag Archives: assembly election

प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव

विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल, प्रियांका गांधी यांनी भाजपाच्या घशात दात घातले… भाजपाच्या टीकेवरून उद्धव ठाकरे यांचा पलटवार

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द वदवून दाखवावे असे आव्हान दिले. भाजपाने दिलेल्या आव्हानला काल प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर …

Read More »

राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय… शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाबाबत सहवेदना, पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचा माहोल सध्या सुरु असून निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आव्हानाची पूर्तता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पूर्ण करत भाजपाला प्रति आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख …

Read More »

अनंतराव गाडगीळ यांचा आरोप, दिल्ली ते गल्ली, भा.ज.पा. ची सारी “गळती सरकार राम मंदिराच्या छतातून तीन महिन्यातच पाणी टपकू लागले

पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल …

Read More »

नवनीत राणा व त्यांच्या समर्थकांवर खुर्च्या फेकल्याः आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांकडून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचारकांची धावपळ सुरु आहे. निवडणूका म्हटलं की प्रत्यारोप हे आलेच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल रात्री अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावी …

Read More »

रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करु नका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने मात्र निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढलेला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील …

Read More »

मोदी आणि शाह यांनी दिलेलं आव्हान प्रियांका गांधी-वड्रा यांनी पूर्ण करत दिलं नवं आव्हान बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल दोन चांगले शब्द बोलण्याचे दिले होतं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरील उट्टे काढण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाच्या नेत्यांनी टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर शरसंधान साधत आव्हानही दिली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही भाजपा आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना काही …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार… जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान मोदींचे मात्र मौन

देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम …

Read More »

राज बब्बर यांची टीका,… हे लक्षात आल्याने पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौ-यावर पळाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ‘कटेंगें बटेंगे’ चालणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने सर्वांनाच मान सन्मान, रोजीरोटी दिली आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न साकारले जाते. सर्व जातीधर्मांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्रात ‘कटेंगे बटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ सारख्या घोषणा देऊन फूट पाडण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करुन ‘कटेंगे बटेंगे’ वरून भाजपा व युतीतील नेत्यांमध्येच …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, व्होट जिहाद करणार असतील तर… नोमानींच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसवर केली टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. त्यात भाजपा प्रणित महायुती आणि पुरोगामी विचारांच्या महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच मुस्लिम उलेमाचे नोमानी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, शिवसेना उबाठावर निशाना साधत …

Read More »