महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा …
Read More »शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे
बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …
Read More »शरद पवार यांची टीका, केंद्र सरकारने विरोधी पक्षनेते पदाचा आदर… राहुल गांधींना बसविले मागच्या रांगेत
काल स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बसण्यासाठी मागच्या रांगेतील जागा दिल्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमावरून एनडीए सरकारवर टिकेची झोड उठली असून काँग्रेसने सरकारची मानसिकता काय आहे याचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी …
Read More »आशिष शेलार यांचा टोला, मुख्यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर महाविकास आघाडीच्या मेळाव्यावरून टीका
आमचाच मुख्यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्गना करणा-या उबाठा गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील चित्र समोर आले आहेत. तसेच ज्याचे आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्री पद हा महायुतीचा फॉम्युला होता हे सत्य ही आज उध्दव ठाकरे बोलून गेले म्हणजे त्यावेळी ते मुख्यमंतत्री पद मागत होते …
Read More »नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहसाठी महाराष्ट्र म्हणजे एटीएम महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न
भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदी-शाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा …
Read More »चित्रा वाघ यांची माहिती, देवेंद्र फडणवीस १८ ऑगस्टला साधणार लाडक्या बहिणींशी संवाद १० हजार महिला उपस्थित राहणार
महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्य़ा बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माता-भगीनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी १८ ऑगस्ट रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप …
Read More »सुप्रिया सुळे यांचा टोला, … हे मी नाही सांगत तर केंद्राचा डेटाच सांगतोय जो न्याय दुसऱ्या राज्यांना तोच महाराष्ट्राला मिळाला पाहिजे
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी भवन प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करुन राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा …
Read More »नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा… लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा शेतकरी, जवानांबद्दल एक शब्दही नाही केवळ राजकीय भाषण
हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला …
Read More »पियुष गोयल यांची ग्वाही, उत्तर मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांची कामे… कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार
मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »
Marathi e-Batmya