कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात थळ ठोकलेला आहे. त्यातच भाजपाच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते कर्नाटकात तळ ठोकून बसले आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे …
Read More »संजय राऊत यांची टीका, मुख्यमंत्र्यांनी भाजपा उमेदवारांना खोके पाठवून….. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेतून हकालपट्टी केली असती
सध्या कर्नाटकातील विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी …
Read More »उध्दव ठाकरे यांच्या टीकेला भाजपाचे उत्तर, वेळ आली की मैदान सोडून… भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिले टिकेला उत्तर
बारसू रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी मंत्र्यांकडून तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसू जागे संदर्भात पाठविलेल्या पत्राचा दाखला देण्यात येत आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगांव येथील स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर महाडमध्ये झालेल्या सभेत …
Read More »उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा, बजरंग बली की जय, मग कुठे गेली तुमची ५६ इंच छाती? काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही
बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज बारसू येथील आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेक जण…. ते जर नसते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते
शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. शरद पवारांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी समितीची स्थापना केली होती. पण, या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला. यानंतर शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत पवारांनी अध्यक्षपदी कायम राहात …
Read More »उध्दव ठाकरे यांचा खोचक सवाल,… भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? कातळशिल्पे वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठविणार
जागतिक वारसा वास्तूचा ठेवा असलेली कातळशिल्पे सोलगांव येथे असून बारसू येथे येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पामुळे ही कातळशिल्प धोक्यात येणार आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे वाचविण्यासाठी आपण जागतिक संघटनेला पत्र लिहिणार असून पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे त्याची आठवणही पर्यावरण संघटनेला पत्र पाठवून करू देणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …
Read More »उध्दव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा,…तर महाराष्ट्र पेटवू आपल्याच जनतेचे नुकसान पोहोचवून सरकार विकास करणार असेल तर असा विकास नको
बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र …
Read More »जयंत पाटील यांचे आवाहन, प्रागतिक पक्ष भाजपाच्या विरोधातच-मविआने विश्वासात घ्यावे शेकाप नेते भाई जयंत पाटील यांचे आवाहन
राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपासोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी काल येथे केले. राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद सभा काल चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात आयोजित …
Read More »नाना पटोले यांची टीका,…. फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत …
Read More »भाजपा-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले “हे” निर्देश राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित
राज्यात एकाबाजूला राजकिय भूकंप आणि उलथापालथींना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वात बदल होतोय की काय अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच शेजारील कर्नाटक राज्यातही विधानसभा निवडणूकांमुळे राजकिय वातावरण चांगलच तापलेले आहे. त्यामुळे राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणूका कधीही लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची शक्यता …
Read More »
Marathi e-Batmya