Tag Archives: bjp

शिंदे गटाच्या युक्तीवादावर न्यायालयाचा सवाल, वेगळा गट नसताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश कसे दिले राजकिय पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेला सदस्यांनी पक्षाकडे मांडायला हवा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीचा आज चौथा दिवस होता. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवशी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आजही दुपारी एक वाजेपर्यंत सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेक झाल्यावर नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजी मांडण्यासाठी युक्तिवाद सुरू केला. …

Read More »

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पेण ( जि. रायगड ) चे शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याखेरीज शहादा (जि. नंदुरबार), परभणी, वसई विरार येथील काँग्रेस, अखिल भारतीय सेना या पक्षाच्या …

Read More »

नारायण राणेंचा अजित पवारांना बारा वाजविण्याचा इशारा देत ठाकरेंच्या खोक्याची कॅसेट माझ्याकडे कसबा निवडणूकीवरून राणेंचा अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी करत, ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर …

Read More »

अशोक चव्हाण यांची टीका, केंद्राच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे न्यायमुर्तीही सुरक्षित राहिले नाहीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजपावर जोरदार टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. न्यायमुर्ती सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत. न्यायालये ही न्यायाची शेवटची आशा असते. उद्या तिथेही न्याय मिळणार नसेल तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? असा परखड सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय प्रस्तावासंदर्भात मते मांडताना …

Read More »

पैसे वाटपाचा आरोप करणाऱ्या धंगेकरांच्या विरोधात भाजपाने केली उमेदवारी रद्दची मागणी पुरावे होते तर सरळ पोलिसांमध्ये तक्रार करायची केवळ प्रचार करण्यासाठीच हा स्टंट-भाजपाचा दावा

कसबा आणि चिंचवड मतदारसंघात उद्या (२६ फेब्रुवारी) पोटनिवडणूक पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपाने पोलिसांना हाताशी घेऊन कसब्यात पैसे वाटप …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, भाजपा सरकारच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ कांद्यावरील निर्यातबंदी उठवा व १५०० रुपये हमी भाव द्या

भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला १५०० रुपये हमी …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत जर… शिवसेना संपविल्याचा आनंद अमित शाह यांच्या चेहऱ्यावर दिसतोय

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय भविष्य यावर मोठं विधान केलं आहे. मुस्लीम समुदायाने साथ दिली, तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबतचे केंद्राचे पत्र केले जाहिर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव होणार

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर होणार आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला …

Read More »

फडणवीसांच्या त्या दाव्यावर शरद पवारांचा खोचक टोला, ते तर मी चेष्टेत बोललो राष्ट्रपती राजवट उठविली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का

मागील काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेत त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच अजित पवारांसोबत शपथ घेतल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, जर त्यावेळी राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का ? असे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा इशारा, असे अनेक गौप्यस्फोट होत राहतील त्यांच्या अनेक उत्तरातून ही माहिती बाहेर काढणार

गेल्या काही दिवसांपासून साधारणतः अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शपथविधीच्या घटनेवर सातत्याने नव्याने चर्चा होत आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सुरुवातीला यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »