हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळींचं अभिनंदन करत होतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार …
Read More »फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,… त्यांनाच विचारण्याची गरज त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायचं नाही
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्यासोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. त्यानंतर गणित काय बदलली हे अजित पवार …
Read More »एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो.. शिंदे गटाच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच केले भाष्य
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला २५ आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यावेळी या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेतेच असल्याची चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरु झाली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी कानावर हात ठेवत शिंदेंच्या बंडखोरीशी कोणताही संबध नसल्याचा सांगत हात झटकण्याचा प्रयत्न …
Read More »एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारकडून वेतनासाठी पैसे महाविकास आघाडीच्या काळातील भाजपाचे नेते मात्र गायब
मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे थकित पगारीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्यानंतर परभणीतील एका एसटी कर्मचाऱ्यांने पगार न मिळाल्याने भेडसावत असलेल्या आर्थिक तंगीमुळे अखेर काल आत्महत्या केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अखेर २५० कोटी रूपये एसटी …
Read More »नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी: जाणून घ्या त्यांचा परिचय शुक्रवारी राजभवन येथे होणार शपथविधी
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे. तत्पूर्वी बैस यांचे शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील. …
Read More »देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर अजित पवारांची स्पष्टोक्ती, मी माझ्या मतावर ठाम पहाटेच्या शपथविधीबाबत मला वाटेल तेव्हाच मी सांगणार
तीन वर्षापूर्वी एकाबाजूला महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी औट घटकेचे सरकार स्थापन केले. त्यासाठी पहाटेचा शपथविधी उरकण्यात आला. या शपथविधीप्रकरणावरून आतापर्यंत ४ पुस्तके निघाली. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीप्रकरणावरून शरद पवार यांचे थेट नाव घेत एकच …
Read More »‘दिवाण-ए-आम’ मधील शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार
आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची …
Read More »पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस पुन्हा म्हणाले, दुसरी वेळ आल्यानंतर उर्वरित सांगेन माझ्या सगळ्या पत्रकार परिषदा पहा मी बोललो त्यात कडी जोडता येईल
जवळपास तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत तो शपथविधी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी …
Read More »सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारला टोला, सोय केली म्हणून ज्योतिर्लिंग दिला नाहीत ना? आसामच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची टीका
काही दिवसांपूर्वी आसाम सरकारने भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र सहावे ज्योतिर्लिंग हे आसाम असल्याचा दावा केला. त्यामुळे जोरदार वाद उफाळला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आसाम सरकारची ती जाहिरातच ट्विट करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवित …
Read More »नाना पटोले, थोरात, चव्हाण एकत्र येत म्हणाले,… आमच्यात कुठलाही वाद नाही काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा
भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहोचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेचे उमेदवार …
Read More »
Marathi e-Batmya