राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाचे तीन तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला. या पार्श्वभूमवीर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकीकडे शिवसेना …
Read More »पुरेसे संख्याबळ मविआकडे पण, बाजी मारली भाजपाने; शिवसेनेच्या ‘संजय’चा पराभव निकाल पहाटेला जाहिर, मविआ आणि भाजपाला तीन तीन जागी विजय
राज्यसभा निवडणूकीतील मतदान करण्याच्या पध्दतीवरून भाजपा आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर आक्षेप घेत त्याप्रश्नी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार शिवसेनेचे सुहास कांदे यांचे बाद ठरवित बाकीच्या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचे मत सांगत आयोगाने निकाल दिला. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांच्या संख्याबळाने दगा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चवथ्या …
Read More »राज्यसभा निवडणूक निकालः आयोगाचा निर्णय काही येईना, सर्वांचा जीव टांगणीला भाजपाच्या आक्षेपावर निर्णय घेण्यास ५ तास उलटून गेले तरी अंतिम निर्णय नाही
राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होवून ५ तास झाले तरी अद्याप मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या भवितव्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या निवडणूकीतील उमेदवारांबरोबरच राज्यातील जनतेला कोण विजयी होणार याबाबतची उस्तुकता लागून राहिली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधी परवानगी मिळेल त्यानंतरच मतमोजणी होवून …
Read More »मुस्लिम समुदायाच्या मोर्चावर संजय राऊत म्हणाले, दंगलींचा डाव देशाचा इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यावरून अरब राष्ट्रांनी भारताबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यावर लावून निषेध केला. तसेच त्या वक्तव्यावरून भारताने माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना पदावरून काढून …
Read More »वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पाठविल्या “या” खास वस्तू तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट आणि निधी भेट म्हणून पाठविल्या-रूपाली ठोंबरे-पाटील
राज्यात एकाबाजूला राज्यसभा निवडणूकीची गरमागरमी सुरु झालेली असून सहाव्या जागेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये वेगळाच कलगीतुरा रंगताना दिसू लागले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोचक शुभेच्छा देण्यात आल्या. …
Read More »एमआयएमचा पाठिंबा, त्यावर भाजपाची टीका तर भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर भाजपाची बी टीम, सी टीम कोण अख्ख्या देशाने पाहिलंय
राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर एमआयएमने आपल्या दोन आमदारांचा पाठिंबा अखेर काँग्रेसला जाहिर केला. तत्पूर्वी एमआयएमने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलिल यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेतील माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. मात्र आज सकाळी मतदानाच्या दिवशीच असुदद्दीन ओवेसी यांनी …
Read More »पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर शिवसेना नेते अर्जून खोतकरांनी दाखविली “ही” तयारी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण पण निर्णय नेतेच घेतील
राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकींचा धुराळा उडायला सुरुवात झाली. चर्चेत असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाल्याने औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, देशात धर्मांधांचे प्रस्थ वाढविण्याचा भाजपाचा प्रयत्न सामाजिक, धार्मिक अस्थिरता देशाच्या आर्थिक प्रगतीला बाधा
विविधतेत एकता ही भारताची ओळख असून तीच ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून देशाची अखंडता कायम ठेवली आहे मात्र, केंद्रातील भाजपाचे सरकार देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे हे कुटील कारस्थान काँग्रेस कदापी पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते खरं हिंदूत्व असेल तर काश्मीरींच्या संरक्षणासाठी जा
मी पोहोचल्यानंतर थोडंस हॉटेलमध्ये टिव्ही पहात होतो. त्यावेळी काही चॅनेलवर तोफ धडाडणार वगैरे असे सुरु होतं. मात्र ढेकणांना चिरडायला तोफेची गरज लागत नाही. तसेच त्या तसल्या फालतू गोष्टीसाठी माझ्या शिवसैनिकांची ताकद मी वाया घालविणार नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज …
Read More »राज्यसभेसाठी मनसे कोणाला करणार मतदान? शेलार यांनी केला खुलासा आमदार राजू पाटील भाजपाला मतदान करण्याची शक्यता
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून सहाव्या जागेसाठी आपल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मनसेचे मत मिळावे यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जाऊन भेट घेतली. …
Read More »
Marathi e-Batmya