Tag Archives: bjp

जे नको ते नाकरणाऱ्या मतदारांचे अभिनंदन भाजपच्या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील भाजप शासित राज्यातील सत्ता मतदारांनी उलथवून टाकली. त्यामुळे भाजप आता नको अशी भावना स्थानिकांमध्ये झाल्यानेच जे नको ते नाकारणाऱ्या मतदारांचे जाहीर आभार मानत असल्याची उपरोधिक टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. निवडणुकीत हार-जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. …

Read More »

सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच छिंदमचा विजय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांचा घोर अवमान करणारा श्रीपाद छिंदम सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच निवडणूक जिंकला असून त्याचा विजय शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा आहे. अशी कठोर प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले …

Read More »

धुळे महापालिकेत सत्ता भाजपकडे तर अ.नगरमध्ये युतीकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक जागा भाजपला तर सर्वाधिक कमी काँग्रेसला जागा मिळाल्या

मुंबई : प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीत डावलले जात असल्याच्या कारणाने भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता येण्यास अडचण होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेत तब्बल ५० जागा जिंकत …

Read More »

छत्रपतींविषयी अनुद्गार काढणारा छिंदम निवडणूकीत विजयी अहमदनगर महापालिका निवडणूकीत दोन हजार मतांची आघाडी

अहमदनगर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने राज्यातील जनतेचा रोष ओढावलेल्या आणि तडीपारीची शिक्षा भोगत असलेला श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणूकीत दोन हजार मतांनी विजयी झाला. शिवरायांबद्दल अनुद्गार काढल्यानंतरही अहमदनगर शहरवासियांनी त्याला स्विकारले हे विशेष आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून येवून शहराच्या उपमहापौर पदी विराजमान झालेल्या श्रीपाद छिंदम यांने …

Read More »

महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …

Read More »

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …

Read More »

भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …

Read More »

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …

Read More »

शिवसेनेला राम पावला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी

मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले. मात्र आता निवडणूका जवळ आल्याने कदाचित शिवसेनेला खूष करण्यासाठी या उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या विजय औटी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे दिसून येत असून शिवसेनेला राम पावला असल्याची मिश्किल …

Read More »

मराठा समाजातील ७२ टक्के नागरीकांचे उत्पन्न ५० हजारापेक्षा कमी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधिमंडळात सादर

मुंबई : प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावरून सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येत होते. तसेच राज्याच्या विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे एक आठवड्याहून अधिक दिवस कामकाजही होवू शकले नाही. अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याविषयीचा कृती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधान …

Read More »