Tag Archives: bjp

भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये

मुंबईः प्रतिनिधी स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले …

Read More »

भाजपला लागलेली उतरती कळा कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

मुंबईः प्रतिनिधी मागील दिड-दोन वर्षात भाजपाच्या हातून राज्ये हातून जात असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड सारखी हाती राहीलेली नाहीत. भाजपाच्या कारभारावर लोकांचा आता विश्वास राहीलेला नसल्याने त्यांची आता उतरती कळा लागली असून ही उतरती कळा कोणी रोखू शकणार नसल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. …

Read More »

नागरिकत्व कायदा विरोधी नागपूर, मालेगांव, मुंबईत मोर्चे दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, लखनौमध्ये दगडफेक जाळपोळ, प.बंगालमध्ये भव्य रॅली

नागपूर/मुंबई/ मालेगांव- प्रतिनिधी नुकत्याच केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरीकत्व कायद्याला दिवसेंदिवस विरोध होत असून सुरुवातीला दिल्ली आणि पश्चिम बंगालपर्यंत असलेले विरोधाचे लोण आता मुंबईसह महाराष्ट्रात आणि लखनौमध्ये पसरत चालले आहे. नागपूर आणि मालेगाव येथे या कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने …

Read More »

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …

Read More »

फडणवीस अभिभाषणावर बोलताय की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करताय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला

नागपूरः प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करत होते तेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले की श्रद्वेय बाळासाहेबांप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला ? …

Read More »

शेतकरी आशेने बघतोय मात्र सरकारकडून फसवणूक सुरूय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूरः प्रतिनिधी राज्यात तीन पक्षांचे मिळून सरकार सत्तेवर बसलय. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारकडून शेतकऱ्यांची अजूनही फसवणूकच करण्यात येत असून कर्जमाफीची घोषणा अद्याप केली नाही. उलट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ ५ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

सरकार स्थापनेवरून रंगली फडणवीस आणि शिंदे यांच्यात खडाजंगी अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेत्यांची घसरली गाडी

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत हे सरकार जनमताचा कौल नाकरून सत्तेत विराजमान झाल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेचे गटनेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गोवा, मेघालय येथे काय केले ते आठवून पहा …

Read More »

शेतकरी आणि पुरग्रस्तांसाठी केंद्राकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी अर्थमंत्री जयंत पाटील यांची सभागृहात माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरीता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केल्याची माहिती अर्थ मंत्री जयंत …

Read More »

बातमीचा फलक मुख्यमंत्र्यांसमोर फडकाविल्याने भाजपा-शिवसेनेच्या आमदारात धक्काबुक्की विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सत्ताधारी-विरोधकांना समज

नागपूरः विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून भाजपाने आज दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई २५ हजाराची द्यावी अशी मागणी करत होते. यावेळी भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरील मोकळ्याजागेत बातमीचा फलक फडकाविण्याचा प्रयत्नास शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, …

Read More »

एकीकडे मराठीचा उदोउदो तर दुसरीकडे हिंदीत बॅनरबाजी भाजपाच्या दुटप्पी धोरणावर नवाब मलिक यांची टिका

नागपूरः प्रतिनिधी एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले …

Read More »