Tag Archives: bjp

अजित पवार यांचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टोक्ती, मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, महायुतीने १०० दिवसात आका, खोके शब्द दिले काँग्रेसची उद्या रविवारी ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा व सोमवारी ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा

महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५८ हजार कोटींच्या विकास कामांचे अमरावतीत उद्घाटन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत विविध विकास कामांचा शुमारंभ

अमरावती राजधानीच्या पायाभरणी प्रसंगी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शहर आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि ते “स्वप्न वास्तवात बदलणे” असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील ५८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरावती हे …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची ग्वाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन पंतप्रधान मोदी यांची आशा, भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल

भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार …

Read More »

जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय

लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जण – बहुतेक नागरिक – मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. नवी दिल्ली येथील …

Read More »

पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, खाजगी व्यक्ती विरोधात स्पायवेअर वापरल्यास चौकशी २०२१ च्या खटल्याच्या सुनावणीप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करताना असे निरीक्षण नोंदवले की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्पायवेअर असलेल्या देशाकडे काहीही गैर नाही आणि खरी चिंता ही आहे की ते कसे आणि कोणाविरुद्ध वापरले जाते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की खाजगी व्यक्तींविरुद्ध स्पायवेअर वापरल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल. इस्रायली स्पायवेअर पेगासस वापरून …

Read More »

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, गृहमंत्र्यांची भूमिका समंज्यसपणाची समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी मांडली भूमिका

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असे वक्तव्य केले. तसेच या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णयही घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी भूमिका स्पष्ट …

Read More »