काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …
Read More »मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांचा महाविकास आघाडी वर घणाघात आपण जिंकलो तर लोकशाही... आणि हरलो तर मतचोरी हा दुटप्पीपणा - आमदार अमीत साटम
कोविडच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी आणि खोटेपणावर पडदा टाकण्यासाठी ‘मतचोरीचा रडिचा डाव’ साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभव नजरेसमोर दिसताच, हा तथाकथित ‘सत्याचा मोर्चा’ काढून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे यावरून स्पष्ट होते. अ’सत्याची’ आरोळी कितीही मोठी असली, तरी ‘सत्य’ कधीच …
Read More »रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण …
Read More »अजित पवार यांची मुरलीधर मोहोळ आणि संदिप जोशी यांच्याबाबत मांडली भूमिका निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवी; खेळाडूंवर क्रीडामंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले. अजित पवार म्हणाले की, सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!
कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे, त्यात संवदेना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार; अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारुन वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील काय? असा सवाल शिवसेना …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. समिती शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात …
Read More »महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार हरित बंदर विकासा बाबत डेन्मार्कच्या कंपनीसोबत चर्चा
नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचइंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले. या करारांमध्ये यामुळे हरित टगबोटीसाठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती, बंदर …
Read More »पंकजा मुंडे यांची माहिती, पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे पशुपालकांची उत्पन्न वाढ राज्यातील पशुपालकांना मिळणार वीजदरात सवलतीचा लाभ
राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री …
Read More »राहुल गांधी यांचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन-हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी …
Read More »
Marathi e-Batmya