Tag Archives: bjp

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती

पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …

Read More »

राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, पार्थ पवार महार वतन जमिनप्रकरणी गप्प का? महार वतन जमिन खरेदीवरून राहुल गांधी यांचा मोदी यांना आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतनाची १८०० कोटी रूपये किंमतीची पुणे येथील कोरेगांव पार्क येथील ४० एकर जमिन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले. तसेच ही जमिनी ३०० कोटी रूपयांना खरेदी करून फक्त ५०० रूपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताचे गायन

जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी वंदे मातरम् म्हटले होते. वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामुहिक …

Read More »

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात ६४.४६ टक्के मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले

गुरुवारी (६ नोव्हेंबर २०२५) बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान संपले तेव्हा तात्पुरते ६४.४६% मतदान झाले, असे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) विनोद सिंग गुंजियाल यांनी सांगितले. दोन्ही आघाडीतील लहान पक्षांसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. सीपीआय (एमएल) ज्या २० जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी दहा जागा या टप्प्यात येतात, …

Read More »

वंदे मातरम प्रश्नी आ. रईस शेख यांची संकल्पना भाजपाने उचलली, जाहिर केला स्वतःचा कार्यक्रम सर्वात आधी आमदार रईस शेख यांनी जाहिरपणे सर्व शाळांमध्ये कार्यक्रम घेण्याची केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये कार्यक्रम राबविण्याबाबतची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लिहिले होते. तसेच याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी केली होती. मात्र यावर राज्य …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून शून्य कारवाई, निवडणूक आयोग झोपेचे सोंग घेत आहे.

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा उपरोधिक टोला, शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवले मतदार यादीतील घोळ दूर करा आणि नंतर निवडणुका घ्या

मी शेलार यांच्यावर बोलत नाही. पण आज त्यांचं खास अभिनंदन आणि कौतुक करतो. की त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार हे वाचून दाखवले. मग दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत. आणि बोगस मतदान झाले नाही अस म्हणत आहेत. त्यालाच एक प्रकारे शेलार यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भारतीय जनता पक्षाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा

राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा पीएपीPAP घोटाळा मालाड पूर्वला ८.७१ लाख चौरस फुटाचा ५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा

भाजपा महायुती सरकारने मुंबईत एक नवीन बिझनेस मॉडेल उदयास आणले असून यातून ‘लाडक्या बिल्डरांचा फायदा करुन दिला जात आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा PAP घोटाळा करण्यात आला आहे. मालाड पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या डोंगराळ भागात ८.७१ लाख चौरस फुटाच्या भूखंडाचा महाघोटाळा केला असून हा मालाड पीएपी PAP घोटाळा तब्बल …

Read More »