Tag Archives: chief minister

हर्षवर्धन सपकाळ यांची सूचना, राजधर्माचे पालन करा आणि मराठा आरक्षणाची घोषणा करा दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा

सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत …

Read More »

शिवनेरी किल्ल्यावरून मनोज जरांगे पाटील यांची टीका, ही तर मराठ्यांची चेष्टा तर देवेंद्र फडणवीस याचं राजकिय करिअर संपेल

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता नव्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका करण्यात आल्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मनोज जरांगे पाटील यांना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले? नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान

स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव …

Read More »

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार ओळखपत्रे, प्रमाणपत्रे, दस्तावेजांसाठी सुलभता

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे  व विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविता येणार आहेत. १८७१ साली ब्रिटिश सरकारने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठक

राज्याला २०४७ पर्यंत ‘विकसित महाराष्ट्र’ करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे. भविष्यामध्ये कुठलीही योजना, उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

निबंधक, भागीदारी संस्था यांच्या उन्नत केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागीदारी संस्था व नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते निबंधक, भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या 2.0 या उन्नत संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. निबंधक भागीदारी संस्थेचे नवे अत्याधुनिक 2.0 …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी रामकृष्ण हरिवाली, मटण खालेलं माझ्या पांडुरंगाला चालत… मी माळ कधी घालत नाही, पण मटण सोडून दिलं तर माळ घालीण

मी रामकृष्ण हरीवाली, पण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते. खरं बोलते बाई मी काही त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मी मटण खाल्ल तर माझ्या पांडुंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही ?, आमचे आई-वडील खातात, नवरा खातो, सासू-सासरे खातात आणि आम्ही आमच्या पैशाने खातो बाबा, …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या राख्यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम

राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या आहेत. यामध्ये बहिणींचे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद आहेत. महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर राहिल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांना पाठिंबा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »