मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील बहुतांष जिल्ह्यात हुक्का पार्लरची केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे राज्याची तरूण पिढी बरबाद आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने या सर्वच हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच पार्लरवर बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने …
Read More »बोंडअळीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी केली ३७ शेतकऱ्यांना अटक
औरंगाबाद: प्रतिनिधी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला वेळेत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाच्याविरोधात संतापलेल्या ३७ शेतकर्यांनी (बुधवारी) दुपारी १ च्या सुमारास सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. गंगापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव …
Read More »शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन
नागपूर : प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे …
Read More »दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, वंचितांसाठी राज्यात ११ विशेष न्यायालये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या घटकासंबंधी एक हजारहून अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या ११ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा आज बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे या घटकांना जलद न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे. दिव्यांग, वरिष्ठ …
Read More »सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना बदली करून घेता येणार महसुली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या वयोवृध्द आई-वडीलांच्या सेवेसाठी आता पर्यत महिला कर्मचाऱ्यांना बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता पतीच्या आई-वडीलांसाठी अर्थात सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार असून त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत …
Read More »२० लाख एलईडी दिव्यांनी उजळणार राज्यातील रस्ते ईईएसएलसोबत आज होणार सांमज्यस करार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या वीज बीलाच्या रकमेत बचत होण्याकरीता राज्याच्या ऊर्जा विभागाकडून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने शहर, तालुका आणि जिल्ह्यातंर्गत रस्त्यांवर तब्बल २० लाख एलईडीच्या दिवे बसविण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईईएसएल आणि ऊर्जा विभागा दरम्यान आज बुधवारी …
Read More »इतिहासातून महापुरुषांची नावे पुसण्याऱ्या भाजपला मानसोपचार तज्ञांची गरज व्देषातच भाजप अडकल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजप नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करीत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली …
Read More »न्यायालयाने आदेश देवूनही रंगशारदा प्रतिष्ठानवर सरकारची मेहरनजर १३ वर्षे झाली तरी सरकारकडून चौकशी नाहीच
मुंबई: प्रतिनिधी नाटयमंदिर बांधण्यासा म्हाडाने दिलेल्या भूखंडावर हॉटेल आणि अन्य व्यवसायिक वापर करणाऱ्या रंगशारदा प्रतिष्ठानाच्या अनियमितताबाबत चौकशीचा प्रस्ताव शासनाने लटकविला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस म्हाडाने दिलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात १३ वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाने भाडेपट्टा करारनामा रद्द करणेबाबत आदेश देत उपाध्यक्ष किंवा मुख्य …
Read More »मंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा सरकारला टोला
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल,अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने …
Read More »आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात ! सत्ताधारी भाजपाचे अपयश लपविण्यासाठी धडपड...
पनवेल : प्रतिनिधी सत्ताधारी गटाचे औषधापुरतेही अस्तित्व जाणवू न देता प्रशासकीय निर्णय घेवून पनवेल महापालिकेच्या कारभाराला विकासाचे पंख जोडणारे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे राजकीयदृष्ट्या डोईजड झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपा नेतृत्वाने अक्षरशः देव पाण्यात बुडवले आहेत. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असलेले जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे पनवेलचे आयुक्त डॉ. …
Read More »
Marathi e-Batmya