Tag Archives: congress

प्रकाश आंबेडकर यांची टीका, काँग्रेसने दलितांना विषारी दात दाखवले एक्सवरून केली काँग्रेसवर केली टीका

१९८२ मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. २०१० मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पण काँग्रेसने हरिजन हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे …

Read More »

एलोन मस्क यांच्या ईव्हीएमबाबतच्या ट्विटला राहुल गांधी यांनी केले रिट्विट उदाहरणा दाखल रविंद्र वायकर यांच्या बातमीचा दिला दाखला

मागील काही वर्षापासून देशात ईव्हीएम मशिन्सबाबतचा संशय बळावत असून या मशिनबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशिन हॅक करता येत नसल्याचे छाती ठोकपणे सांगत आहे. मात्र देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या मेव्हण्यानेच फोनच्या माध्यमातून ईव्हीएम मशिन्समध्ये हस्तक्षेप केल्याचा नवी माहिती पुढे येत आहे. त्यातच …

Read More »

लोकसभेचे उपसभापती पद न दिल्यास इंडिया आघाडी निवडणूक लढविणार एनडीए सरकारवर दबाव आणण्यासाठी आघाडीची रणनीती

लोकसभा निवडणूकीत एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर आता बहुमत सिध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून पावसाळी अधिवेशन बोलावले असून या पावसाळी अधिवेशनातच सभापती आणि लोकसभेच्या उपसभापती पदावरील निवड करण्यात येणार आहे. परंपरेने सभापती पदावर केंद्रातील सरकारकडे असते, तर उपसभापती विरोधी पक्षांना देण्यात येते. मात्र जर उपसभापती …

Read More »

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या गाण्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले…कदाचीत त्यांच्यासोबत जायंच असेल तर या दोघांच्या मध्ये बसून हो म्हणू का

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास बरोबर आज आठ ते दहा दिवस होत आहेत. तसेच पुढील तीन-चार महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूकाही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेनना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार, नरेंद्र मोदींनी तयार केलेले नॅरेटीव्ह नव्हते का? महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या इंडिया आघाडीवर टीका करताना घरातून नळ तोडून नेतील, मंगळसुत्र काढून घेतील, घरातील म्हैस ओढून नेतील या सारख्या अनेक गोष्टी बोलल्या. तसेच यापूर्वी अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या बँख खात्यात १५ लाख रूपये देणार यासह अनेक मोठमोठ्या घोषणा करत भाजपाने आणि मोदी यांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? डोंबिवलीनंतर नागरपूरातील कंपनीतही स्फोट

गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार; आम्ही परत येऊ, वंचित परत येईल भाजपा नागनाथ तर काँग्रेस सापनाथ

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष भाजपाची बी टीम असल्याची टीका केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स ट्विटरच्या माध्यमातून आज संताप व्यक्त करत मी भाजपाची बी टीम आहे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, जागावाटप मेरिटनुसार झाले तरच मविआचा फायदा नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे …

Read More »

विधान परिषदेच्या निवडणूकीत शिवसेना उबाठा+ काँग्रेस विरूध्द भाजपा लढत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दीपक सावंत यांच्यासह अनेकांची माघारः २६ जून रोजी मतदान

विधान परिषदेच्या चार जागेसाठी ८८ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले. मात्र यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज माघार घेतल्याने मुंबईतील ८ जण रिंगणात आहेत. तर कोकणात मनसे पाठोपाठ शिवसेना उबाठा गटाच्या किशोर जैन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, आकस कायम… निधी वाटपात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय मोदी-शाहसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस अजित पवारांची हिम्मत नाही

महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेशला सर्वात जास्त २५ हजार कोटी रुपये, मध्य प्रदेशला १० हजार …

Read More »