Tag Archives: congress

काँग्रेस सोबतचे जवळपास दोन पिढ्यांचे संबध मिलिंद देवरा यांनी तोडले एकनाथ शिंदे यांच्या गटात केला प्रवेश

एकेकाळी काँग्रेसच्या वैभवाच्या काळात स्व. मुरली देवरा आणि स्व.गुरुदास कामत यांनी स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तुंग नेत पक्षाच्या वैभवातही भर घालण्याचा आणि मुंबईतील काँग्रेसच्या ताकदीत भर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस ना कधी मुरली देवरा यांनी केले ना कधी गुरुदास कामत यांनी त्यांच्या उभ्या ह्ययातीत केले नाही. मात्र …

Read More »

इंडिया आघाडीच्या प्रमुख नेते पदाची धुरा मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे

देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, जनता दल युनायटेडचे नितीशकुमार, आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल, शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत, द्रमुकचे नेते यांच्यासह अनेक प्रमुख पक्षाचे नेते ऑनलाईनरित्या उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीच्या अध्यक्ष कोण असावा यावर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा

राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरु केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर ८ हजार कोटीपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा कार्यक्रम …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे तरी योगदान काय?

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा, मोदींनी कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचा…

देशातील लोकसभा निवडणूकीला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्या पार्श्वभूमी वर काँग्रेस आणि भाजपा नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. तसेच भाजपाला अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जेवढी सोपी समजतात तेवढी ती सोपी राहिलेली नसल्याचा इशारा देत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर काय होते …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसची… पुन्हा एकदा तीच मानसिकता

काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

काँग्रेस म्हणते, भाजपाला फक्त ३० टक्के, तर ७० टक्के मते…..

भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधीपक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे …

Read More »

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार

मागील दिवसांपासून देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्याचा कार्यक्रम अयोध्येत पार पडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही यावरून विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर श्वेत पत्रिका काढा

पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. यापुढील सर्वच …

Read More »