Tag Archives: congress

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का ? आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय

विरोधी इंडिया गट मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे नेते गौरव गोगई यांनी सांगितले.  सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) इंडिया आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात मतदार चोरीचा आणि आयोग सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आणि निवडणूक आयोगाच्या आरोपांना …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत दाखवा स्वप्नांचे व्यापारी देवेंद्र फडणवीस- दुबई सारखे शहर बनवण्याआधी १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत ते दाखवा

काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी म्हणाले की दोन वर्षांमध्ये भारतात अमेरिकेसारखे रस्ते होतील. आता मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी म्हणतात की एमएमआर मध्ये दुबई पेक्षा मोठे सुंदर शहर वसवू. भाजपा नेत्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातील ९०% …

Read More »

मत चोरीच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सासाराम येथून मतदार अधिकार यात्रेला सुरुवात, १६ दिवस चालणार यात्रा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील सासाराम येथून १६ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा १,३०० किलोमीटर अंतर कापेल आणि १ सप्टेंबर रोजी पटना येथे एका मोठ्या रॅलीने संपेल, जिथे विविध भारतीय पक्षांचे नेते सहभागी होतील. एक्स वरील पोस्टमध्ये …

Read More »

सीईसी ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधींच्या आरोपावर राजकीय उत्तर, चुकीची माहिती समाधानकारक उत्तर न देताच आरोपकर्त्ये राहुल गांधी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न

साधारणतःवर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आणि महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणूकीत कर्नाटकात लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपासाठी निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप केला. त्यासाठी मतदार यादीतील चुकीची नावे, एकाच पत्यावर अनेक मतदारांची नाव नोंदणी आदी अनेक गोष्टींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. तसेच बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून …

Read More »

निवडणूक आयोग म्हणतो, समस्या आधी सांगितल्या असत्या तर त्या ईआरओकडून…. प्रत्येक टप्प्यावर राजकिय पक्षांचा सहभाग

मागील निवडणुकांमधील मतदार यादीतील कथित त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या राजकीय पक्ष आणि व्यक्तींवर भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) शनिवारी टीका केली आणि म्हटले की नियुक्त दावे आणि हरकती कालावधी नेमके याच उद्देशाने अस्तित्वात आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आणि म्हटले की ही एक पारदर्शक, बहु-टप्प्याची प्रक्रिया …

Read More »

काँग्रेसचे पवन खेरा म्हणाले म्हणते, तर एनसीईआरटीचे पुस्तक जाळून टाका इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शनिवारी फाळणी भयपट स्मृतिदिनानिमित्त एनसीईआरटीच्या नवीन मॉड्यूलवर तीव्र हल्ला चढवला आणि आरोप केला की त्यात महत्त्वाची तथ्ये वगळण्यात आली आहेत आणि इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. पार्टीशन्स हॉरर अर्थात फाळणी भयपट स्मृतिदिनानिमित्त एनसीईआरटीने हे विशेष मॉड्यूल जारी केले. त्यात भारताच्या फाळणीसाठी मुहम्मद अली जिना, काँग्रेस …

Read More »

भाजपा नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरी केला पक्ष प्रवेश

नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराkeष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले स्वातंत्र्य चळवळ व रा. स्व. संघाचा संबंध काय? काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, बंच ऑफ थॉटला अभिप्रेत असा जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून होळी केली

देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या चिप मिनिस्टरला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहे आणि त्यासाठीच गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉटला अभिप्रेत भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा सर्व खटाटोप केलेला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला …

Read More »