काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत असताना पक्षाच्या ‘राजघराण्या’ची झोप उडाली असून, पाकिस्तान आणि काँग्रेसचे दोन्ही नामदार अद्याप ऑपरेशन सिंदूरमधून सावरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच लपलेल्या ठिकाणी शोधून काढत आहे. अलिकडेच आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले. आम्ही आमची …
Read More »काँग्रेसचे जयराम रमेश यांची दिल्ली सरकारच्या निर्णयावर टीका, क्रुर विनोद दिल्ली सरकारच्या क्लाऊड सीडींग प्रयोगावरून टीका
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लाउड सीडिंग प्रयोगाबद्दल काँग्रेसने रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) दिल्ली सरकारवर टीका केली आणि म्हटले की मर्यादित क्षेत्रात एक-दोन दिवसांसाठी थोडीशी सुधारणा करणे हा “क्रूर विनोद” असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस (संप्रेषण) जयराम रमेश म्हणाले की, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्ली सरकारने हिवाळ्यातील …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा
आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? राज्यातील गुन्हेगारीला फडणवीसांचे पाठबळ; मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक गंभीर प्रश्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्याच, उच्चस्तरीय चौकशी करा डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई का, ते कोणाला व का वाचवत आहेत
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी राजकीय दबाव, ब्लॅकमेलिंग व त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. भाजपाचा माजी खासदार, प्रशासन व पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून तीला आयुष्य संपवावे लागले. पण ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआय, एसआयटी अथवा स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरला मोर्चा
मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »राहुल गांधी यांचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन-हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी …
Read More »राहुल गांधी यांची टीका, नरेंद्र मोदींना मतांसाठी नाचायला सांगितले तर नाचतील नितीश कुमार यांच्या मुखवट्यामागे भाजपा
बिहार निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्भयपणे हल्ला चढवला आणि ते “मतांसाठी काहीही” करत असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले तर ते स्टेजवर नाचतील, असा उपरोधिक टोलाही यावेळी सांगितले. …
Read More »
Marathi e-Batmya