Tag Archives: congress

नाना पटोले यांचा सवाल, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणे गुन्हा का ? दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, तरीही जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू

देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराव घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही… सोनिया गांधी यांच्या घराभोवती फौजफाटा वाढविला

नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी ईडीने हेराल्ड हाऊसमधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला सील केले. त्याचबरोबर काँग्रेस मुख्यालयाबरोबरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घराभोवतीही फौजफाटा वाढविण्यात आला. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आव्हान दिले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींना …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, राजभवनाला घेराव घालणार महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात उद्या शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार

केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून उद्या शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार …

Read More »

नाना पटोले म्हणाले, छापेमारी सूडबुद्दीने, पण मोहित कंबोजची भेट योगायोगाने ईडीला फक्त विरोधी पक्षांवर कारवाई करण्याचेच काम; काँग्रेस कारवायांना घाबरत नाही

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधकांना संपवण्याचा चंगच बांधला असून ईडीच्या कारवाया हा त्याचाच भाग आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊनही भाजपा सरकारचे समाधान झालेले नसल्याने आता नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या देशभरातील कार्यालयावर छापेमारी केली आहे. ईडीची ही छापेमारी केवळ राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप काँग्रेस …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये नाही तर अवस्था… सत्तेचा फेस गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल

देशात ६०-६५ वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. मात्र आजची त्यांची अवस्था पाहिली की आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये असा खोचक टोला भाजपासह बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत जे हमाम मे… म्हणून सगळे तिकडे गेलेत. त्या सर्वांच्या शरीरावर सत्तेचा जो फेस आहे तो निघून गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल असा इशाराही शिवसेना …

Read More »

काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा इशारा,.. अन्यथा स्मृती इराणींना रस्त्यावर फिरू देणार नाही केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणुतील घरावर महिला काँग्रेसची धडक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मर्यादा ओलांडली आहे. देशासाठी दोन महान व्यक्तींचे बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबातील सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचाही त्याग करून राजकारणात एक आदर्श घालून दिलेला आहे. विरोधी पक्षातील लोकांशीही त्या आदराने वागतात. अशा आदरणीय सोनियांजी यांच्याशी गैरवर्तन करून स्मृती …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा मुंबईबद्दलचे राज्यपालांचे वक्तव्य संतापजनक, महाराष्ट्राची माफी मागा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची महामहिम …

Read More »

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याचे पाप भाजपाचेच काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांचा आरोप

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षणास मुकावे लागणार आहे. कोर्टात योग्य बाजू मांडण्यात शिंदे-फडणवीस सरकार कमी पडल्याने या निवडणुका ओबीसी आरक्षणशिवायच होणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला. भारतीय जनता पक्ष …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ईडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ नाही अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्री, मुख्य सचिव व राज्यपालांना सादर करणार

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशेने पहात आहे परंतु राज्यात झोपे गेलेले, आंधळे, बहिरे ईडी सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही म्हणून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी …

Read More »