थेट परदेशी गुंतवणूकीत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात अधिक आली असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे य़ेतात तसेच अपश्रेय ही पुढे येऊन घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ राज्य सरकार आणि आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संयुक्तपणे राबविणार
राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मग मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का? आरक्षणाच्या नावाखाली मराठा व ओबीसी समाजात भांडण लावले, फडणवीसांच्या शब्दावर किती विश्वास ठेवणार?
राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र …
Read More »रईस शेख यांचा इशारा, अमेरिकन टॅरिफमुळे निर्यातीत घट, पॉवरलूम क्षेत्रावर संकट ऑर्डर कमी होत चालल्याने पॉवरलूम बंद पडण्याची भीती
अमेरिकेच्या ५०% टॅरिफचा सर्वात जास्त फटका वस्त्रोद्योग क्षेत्राला बसल्यानंतर, भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पॉवरलूम उद्योगावरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती मागितली आहे. भारताच्या कापड निर्यातीत याचे योगदान ६० टक्के आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे १३ निर्णय संजय गांधी निराधार ,श्रावणबाळ, दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढसह १३ निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खुष करणारे निर्णय घेतल्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयातून दिसून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, निर्णयावर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा ब्रिटीश काळातील नोंदी हैद्राबाद गॅझेटमध्ये
मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून,या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही.न्या.शिंदे समिती आणि कायदे तज्ञाशी चर्चा करून निर्णयाच्या मjeOeसूद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले.मात्र निर्णयावर टिका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. मंत्रीमंडळाच्या उपसमीतीने …
Read More »मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यावर टीका यापुढेही मराठा समाजासाठी काम करतच राहणार
मागील पाच दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले होते. तसेच मागील तीन-चार वेळेप्रमाणे राज्य सरकार ठोस निर्णय न घेता मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नुसत्याच ऐकून नाही घेतल्या तर …
Read More »सुप्रिया सुळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटः बैठक बोलवा आझाद मैदानावर दिवे बसवावे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेते पदाधिकारी सध्या भेटीसाठी येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. …
Read More »मनोज जरांगे यांचा कडक उपोषणाचा इशारा देत राजकीय नेत्यांवर टीका राज ठाकरे कुजक्या कानाचे, चिंचुद्रीसारखे लाल , चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या शिव्या खावू नका
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांनी रस्त्यांवर आणि रस्त्यांवर गोधळ घालू नये असे आवाहन करत मी तुम्हाला आरक्षण घेऊन देण्यासाठी मी इथे बसलोय ना …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, ही शेवटची लढाई मुख्यमंत्री फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस मुदतवाढ दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya