Tag Archives: devendra fadnavis

एसटी भाडेवाढीवरून दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्पर विरोधी विधानेः मात्र भाडेवाढ तर लागू अजित पवार म्हणतात, भाडेवाढीची फक्त चर्चाः तर एकनाथ शिंदे म्हणाले, चांगल्या सेवेसाठी भाडेवाढ

राज्यातील महायुती सरकारमध्ये बाहेरून कितीही सारं काही अलबेल असल्याचे चित्र टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तशी परिस्थिती महायुतीतील नेत्यांमध्ये तशी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एसटी भाडेवाढीवरून मुख्यमंत्री पदानंतर महत्वाचे असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र मते-मतांतरे असल्याचे दिसून येत आहे. पंरतु या दोघांच्या …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, दावोसमधील गुंतवणूक फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! असा उपरोधिक टोलाही …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, दावोस दौऱ्यातल्या कंपन्या भारतातल्या तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही ? मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला

आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्या दरम्यान २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. …

Read More »

शरद पवार यांची टीका, दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा महाराष्ट्रातील कंपन्यांनाच तिथे बोलावून उद्योग आणत असल्याचा देखावा

दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, शिंदे व फडणवीस सरकारने दावोससंदर्भात श्वेतपत्रिका काढावी ‘बुक माय शो’, ‘हिरानंदानी’शी करार करून सरकार काळाबाजारी व गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहे का?

दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत, …

Read More »

सुप्रिया सुळे यांची भीती, राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती संसदेत मांडणार हा विषय मांडणार

राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे ८ लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे …

Read More »

दावोसमध्ये १५.७० लाख कोटी गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मितीचे ५४ सामंजस्य करार रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार

जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मदत जाहिर मृतांच्या कुटुंबिंयाना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार मदत व बचाव कार्याचे दावोस येथून समन्वय

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या परधाडे रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४,९९,३२१ कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२,२३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आपलचे निर्णय रद्द करण्याची वेळ सरकार का आली? महाराष्ट्राची आजची परिस्थिती अस्वस्थ करणारी

पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. तुम्हाला जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने आता कामाला लागायला …

Read More »