भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. इंदू मील मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासही भाजपा सरकारच्या वेळेकाढूपणाचा फटका बसला आहे. सरकारची इच्छाशक्ती व मानसिकताच नसल्याने स्मारकाचे काम रखडले आहे, असा …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कॅनडा सरकारकडून असाही सन्मान एप्रिल महिना कॅनडात दलित हिस्ट्री महिना म्हणून जाहिर
कधीकाळी कॅनडा हा देश ही ब्रिटीश वसाहतीचा भाग होता. तसेच ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ हा कॅनडाचा भाग आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापाठात प्रवेश घेतला होता. आणि त्या विद्यापीठाची पदवीही कमी कालावधीत घेतली होती. त्यामुळे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती एप्रिल महिन्यात …
Read More »शाहू, फुले, आंबेडकर आठवताना…आजच्या हंटर कमिशनला भिडायला हवे शाहु-फुले-आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ प्रदिप आवटे यांचा खास लेख
आपण बोलताना महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असे अगदी नेहमीच म्हणून जातो. या तिघांच्याही जीवनकार्यातील एक गोष्ट मला नेहमी ठळकपणे जाणवते. संस्थानिक असणा-या शाहू महाराजांनी त्या काळी त्यांच्या एकूण वार्षिक बजेटपैकी सुमारे २२ टक्के निधी हा शिक्षणासाठी खर्च केला. महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा तर काढलीच पण त्याशिवाय शूद्र …
Read More »‘जय भीम पदयात्रा’ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने १३ एप्रिल रोजी ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले. प्रथमच देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ही राष्ट्रीय …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीः लोकशाहीला असलेले धोके विसरत आहोत का? सध्या देशात निवडणूकांचे वातावरण असल्याने राज्यघटना आणि लोकशाही यासंदर्भात देशात राजकिय आरोप प्रत्यारोप वाढत आहेत.
देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत ह्या देशाला बांधून ठेवणारी राज्यघटना कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तेव्हाच्या संसदेतील लोकप्रतिनिधींनी ९ डिसेंबर १९४६ साली संसदेची अर्थात कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अगणित चर्चा, वाद विवाद, नवी विधेयक सादर करत तर आहे …
Read More »गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रु. आनंदाचा शिधा दिवाळी प्रमाणे या दोन्ही दिवशी शिधा वाटपाचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व …
Read More »शरद पवार म्हणाले, देशातील राजकीय स्थैर्य डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम
आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या शेजाऱ्यांकडे बघतो त्यावेळी राजकीय स्थैर्य आणि लोकशाहीची किंमत लक्षात येते. भारताचे राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण …
Read More »डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधा-यांचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी …
Read More »मविआ सरकार साजरी करणार भारतरत्न डॉ. आंबेडकरांची १० दिवस जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार - धनंजय मुंडे
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. ६) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करा, पण नियमावली जाहीर होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिले प्रशासनाला निर्देश
मागील दोन वर्षापासून कोविड संसर्गाजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर य़ांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र आवश्यक नियमावलींचे परिपत्रक गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतरत्न …
Read More »
Marathi e-Batmya