Tag Archives: eknath shinde

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …

Read More »

शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा, …अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्र लिहित दिला इशारा

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र राज्य सरकार अजून अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत नाही. या दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पहात राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी

लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पैसे वाटल्याच्या लेखातून आरोपावरून नोटीस बजावली

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या सामना या दैनिकात लेख लिहून लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगणित पैसा खर्च केल्याचा आरोप त्या लेखातून केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवित एकतर …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, सरकारला जागं करतोय, अन्यथा आम्हाला इतर पर्याय… पाणी साठा सर्वात कमी

राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत आज बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये पावसाची स्थिती …

Read More »

डोंबिवलीतील बॉयलरच्या लागोपाठ स्फोटात सात जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी ठाणे महापालिकेची माहिती

एकाबाजूला वातावरणातील उष्णतेने आधीच हैराण असलेल्या नागरिकांना विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील एमआयडीसी-२ मधील अनुदान कंपनीच्या बॉयलरच्या झालेल्या स्फोटाच्या घटनेत दोन महिला आणि पाच पुरुष अशा किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने २३ मे रोजी दिली. स्फोटानंतर दुर्घटनेच्या ठिकाणी काही कामगार …

Read More »

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवित केली न्यायालयीन चौकशीची मागणी पुणे पोलिसांचा कार अपघात प्रकरणात हलगर्जीपणा, राजकीय हस्तक्षेप होता का?

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भिषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असताना कार चालकाची अवघ्या १५ तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर असून गरिब व श्रीमतांना वेगळे कायदे असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. कार चालक हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याची सहज सुटका करण्याचा प्रकार झाला हे अत्यंत आक्षेपार्ह व सामान्यांना …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, राज्याची प्रगती, तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात महाराष्ट्रात येऊ घातलेला अजून एक प्रकल्प परराज्यात

महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या बातमीने समोर आल्याचे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत याबाबत राज्य सरकारला दानवे यांनी जाब विचारला. तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे

संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. धरणातील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पिण्याचे पाणी मिळावे तसेच …

Read More »