Tag Archives: eknath shinde

वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट जेसीबी ऑपरेटर राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ५० लाखांची मदत तर कुटूंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी

ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड …

Read More »

किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी पहिल्यांदाच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

वक्फ मंडळासाठी राज्य सरकारकडून ​१० कोटींच्या निधी शासन निर्णयही जारी केला

राज्यातील महायुतीच्या राज्य सरकारने ​वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद ​केली असून त्यापैकी २ कोटी रुपयांचे ​१० जूनला वित​रीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या महायुतीच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​ केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना वर्ष …

Read More »

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …

Read More »

शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा, …अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्र लिहित दिला इशारा

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र राज्य सरकार अजून अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत नाही. या दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पहात राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी

लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पैसे वाटल्याच्या लेखातून आरोपावरून नोटीस बजावली

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या सामना या दैनिकात लेख लिहून लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगणित पैसा खर्च केल्याचा आरोप त्या लेखातून केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवित एकतर …

Read More »