Tag Archives: election commission of india

जगनमोहन रेड्डी यांच्यावरील हल्ल्याची निवडणूक आयोगाचे घेतली दखल

काल रात्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचार यात्रेच्या दरम्यान काही अज्ञात जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांना अधिकची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या दगडफेकीवर टीडीपी अर्थात तेलगू देसम …

Read More »

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार …

Read More »

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती …

Read More »

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा

राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या त्या टीकेवरून काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस उरले असून, काँग्रेससह भाजपा आणि इतर प्रादेशिक पक्ष पूर्णतः निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर येथे काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका करताना जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी विरोधी …

Read More »

वंचितसह अपक्ष, लहान-मोठया पक्षाच्या उमेदवारांना ‘या’ चिन्हाचे वाटप

देशातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत काल संपली. तर महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची मुदतही संपली. या पाच लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहिर केले. परंतु वंचित बहुजन आघाडी रोड रोलर, …

Read More »

अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिली. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक …

Read More »

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …

Read More »