राज्यातील अर्ध्याहून अधिक भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून आणि वहिवाटीवरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये वाद आहे. या वादामुळे अनेक वेळा खून किंवा मारामाऱ्या तर कधी कोर्टकज्जे आदी होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. यापार्श्वभूमीवर राज्यातील बांधाला बांध लागून असलेल्या शेतकऱ्यांमधील वाद मिटावा या उद्देशाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘सलोखा योजना’ जाहीर केली. शेतकर्यांमध्ये …
Read More »पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही होणार, पण न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, या संदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री …
Read More »शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे विमा कंपन्या व सरकारकडून शेतकऱ्याला तातडीने मदत मिळेल हे सुत्र सरकार ठेवणार का ? बाळासाहेब थोरात यांचा प्रश्न
शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारच्या वतीने व पीकविमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु पीकवीमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना १०० रुपये, १२८ रुपयांचे धनादेश मिळाले आहेत, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून विमा कंपन्या व राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याला …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढा देणार
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, बील भरले नाही म्हणून वीज कापू नका
कोविड काळानंतर राज्यातील अनेक भागात वीज बील भरणा केला नाही म्हणून कृषी पंपासह घरगुती वीज तोडणी मोहिम महावितरणने सुरु केली. त्यामुळे अनेक भागात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे घटना सर्रास घडताना दिसून येत होत्या. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आदेश देत वीज बील भरले …
Read More »राहुल गांधींची टीका, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर…
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे …
Read More »शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भात जलसंधारणाची मोठी कामे होणे गरजेचे
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेला माननारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपाने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड जनसमर्थन तर मिळालेच पण शेगावमध्ये अभूतपूर्व अशी विराट सभा …
Read More »सभासद नसलेला शेतकरीही आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीच्या निवडणूक लढवू शकणार
आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. या अधिनियमाच्या 13 (1)(अ) …
Read More »राहुल गांधींचा आरोप, मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही, पैसाही नाही. शेतात राबराब राबणाऱ्या शेतकरी देशोधडीला लावला आहे. पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दमडीही मिळत नाही, विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट …
Read More »सांगोल्याचे शेतकरी आदित्य ठाकरेंना म्हणाले, आमचे आमदार खोके घेऊन गायब सांगोल्यात भर उन्हात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकरी संवाद यात्रा काढत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे बुधवारी सांगोल्यात भर उन्हात शेतकऱ्यांशी शेताच्या बांधावर संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक आमदार शहाजी बापू पाटील यांच्याविषयीचा संताप आदित्य ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला. आमचे आमदार खोके घेऊन गायब झालेत, अशी …
Read More »
Marathi e-Batmya