Tag Archives: mumbai high court

मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि विपुल पांचोली यांना सर्वोच्च न्यायालयात बढती केंद्र सरकारने केली सर्वोच्च न्यायालयात केली पदोन्नती

केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आज दुपारी ही घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची मंजूर संख्या असून, सध्या ३२ न्यायाधीश आहेत, तर २ पदे रिक्त …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली, पण… पोलिसांनी समोर ठेवल्या तीन अटी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत जवळपास सहा ते सात वेळा आमरण उपोषण पुकारण्याऱ्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे यांनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे आरक्षण प्रश्नी मुंबई आंदोलन करण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी कुच करणार असल्याचे जाहिर करताच भाजपा समर्थित काही जणांकडून मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगे पाटील यांना नोटीस, परवानगीशिवाय आंदोलन नाही गणेशोस्तवामुळे कायदा व सुव्यस्थेच्या प्रश्न

सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही हे लक्षात घेऊन, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाहीत असे स्पष्ट आदेश दिले. तसेच गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा हवाला दिला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि न्यायमूर्ती …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापन तपास पथकात परभणीतील कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही

परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. या विशेष तपास पथकात …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे ८ दिवसांत एसआयटी स्थापनेचे आदेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद, राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे …

Read More »

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती विधिमंडळात देत अपराधी पोलिसांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर गुन्हे …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, ७/११ लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सर्व १२ आरोपींनी विशेष न्यायालयाने दोषी ठरवित काही जणांना फाशीची तर जन्ठेपेची शिक्षा

२००६ साल च्या ७/११ ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींना विशेष न्यायालयाने मृत्युदंड आणि उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर जवळजवळ एक दशकानंतर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त केले [महाराष्ट्र राज्य विरुद्ध कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी आणि इतर]. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर आणि श्याम …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, नाते तोडल्यानंतर मुलीच्या आत्महत्येस जबाबदार ठरवता येत नाही मुलाने ९ वर्षापासूनचे नातेसंबध तोडले आणि लग्नाला नकार दिला

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी असा निर्णय दिला की, एका महिलेने तिच्या ‘दीर्घकाळापासूनच्या नात्या’ तोडल्यानंतर आत्महत्या केली म्हणून तिच्यावर तिच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी ९ वर्षांपासून नातेसंबंधात असलेल्या एका महिलेच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेल्या पुरूषाला दोषमुक्त केले. “हे …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी याचिका फेटाळून लावली ९ विद्यार्थ्यींनी दाखल केलेली याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून रोजी शहरातील एका महाविद्यालयातील नऊ महिला विद्यार्थिनींनी हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, रिसेप्शन हा काही विवाह विधीचा भाग नाही

रिसेप्शन हा विवाह विधीचा भाग मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे सांगितले की, मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाला घटस्फोटाच्या खटल्याचा अधिकार नाही. कारण या जोडप्याने मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते आणि काही दिवस येथेच वास्तव्य केले होते. . “लग्नाचे सर्व विधी ७ जून २०१५ रोजी जोधपूर, …

Read More »