महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौऱ्यावर …
Read More »महेश तपासेचा केसरकरांवर पलटवार; बेकायदेशीर प्रवक्त्यांचे बेजाबदार वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर
दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटीमागे शरद पवार हेच होते असा खळबळजनक आरोप करत नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या बंडामागे तेच होते. तसेच ही माहिती आपणास शरद पवार यांनीच दिल्याचा दावा केला. या आरोपावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »दिपक केसरकर यांचा आरोप: मला पवारांनीच सांगितले, शिवसेना फुटी मागे ते स्वत: राज ठाकरे, नारायण राणे आणि छगन भुजबळांच्या बंडामागे शरद पवार
सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा खळबळजनक आरोप केला. मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या …
Read More »मुंबई महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी; शरद पवार यांचे निर्देश सोबत कोणी येईल याचा विचार करू नका कामाला लागा
राज्यातील शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. त्यातच आता मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या या बदलेल्या राजकिय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी सोबत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला असून …
Read More »सुप्रिया सुळे यांचा इशारा, लक्षात ठेवा १०५ मध्ये आमच्यातून गेलेले ५० आहेत… शरद पवार पाऊस कमी झाल्यानंतर शेवटच्या युवकापर्यत जाणार
निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधानही खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आता विरोधी पक्षाच्या …
Read More »शरद पवार म्हणाले, तर एकही बंडखोर निवडूण येणार नाही… अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही - शरद पवार
आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद दुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी …
Read More »जयंत पाटील म्हणाले, आगामी निवडणूकीत २७ टक्के उमेदवार ओबीसीचे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठका
ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतिक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक …
Read More »शिवसेनेतील बंडावर शरद पवार म्हणाले, आताची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भाषणामुळे… निवडणूकांसाठी आतापासून तयारी करण्याचे आदेश दिले
राज्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर याबाबत शरद पवार यांनी पहिल्यांच भाष्य करताना म्हणाले की, शिवसेनेत जे बंड झाले. त्या बंडखोरांकडे बंडाचे नेमके कारणच नाही. त्यांनी सुरुवातीला एक कारण दिले. आता वेगळेच कारण सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडाला नेमके कारणच नाही. मात्र शिवसेनेत अशावेळी असलेली परिस्थिती …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ व्हिडिओवरून अजित पवार यांनी साधला निशाणा मी पण फोन केला पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही
राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर नव्याने राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी या दोघांनी भाजपाच्या नेत्यांची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीत आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर …
Read More »शरद पवार म्हणाले, ‘तो’ विषय अजेंड्यावर नव्हता; श्रीलंकेतील परिस्थितीचा बोध घ्यावा पण तो निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा असल्याने मान्य करणे भाग
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत धाराशिव आणि औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो विषय आमच्या तिन्ही पक्षाच्या कॉमन मिनिमन प्रोग्राममध्ये नव्हता. इतकेच नव्हे तर त्या विषयावर आमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र त्याबाबत निर्णय झालेला नव्हता. हा निर्णय घेतल्यानंतरच तो विषय आम्हाला माहित झाल्याची माहिती …
Read More »
Marathi e-Batmya