Tag Archives: prime minister

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५८ हजार कोटींच्या विकास कामांचे अमरावतीत उद्घाटन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत विविध विकास कामांचा शुमारंभ

अमरावती राजधानीच्या पायाभरणी प्रसंगी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शहर आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि ते “स्वप्न वास्तवात बदलणे” असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील ५८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरावती हे …

Read More »

विझिंजम बंदराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रांत्रिय आणि केंद्रीय राजकारण विझिंजम बंदर उभारणीत अदानी पोर्टचा सहभाग

शुक्रवार (२ मे २०२५) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे अधिकृत उद्घाटन केले तेव्हा राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणाचे दर्शन घडले. ही सुविधा राष्ट्राला समर्पित करणारे मोदी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर तिरकस टीका केली. त्यांनी असे पाहिले की, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि खासदार शशी थरूर हे दोन प्रमुख …

Read More »

पंतप्रधान मोदींची आता पाकिस्तानऐवजी देशांतर्गत विरोधकांवर टीका, अनेकांची झोप उडेल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या उपस्थितीवरून विरोधकांवर टीका

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला आता १० दिवसांचा कालावधी लोटला तरी दहशतवाद्यांची जमिन आणि त्यांना कठोरात कठोर शासन देणार असल्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे केली होती. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान असलेला १९६० चा सिंधू नदी करारा …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची ग्वाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन पंतप्रधान मोदी यांची आशा, भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल

भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार …

Read More »

जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय

लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …

Read More »

वेव्हजचे उद्घाटन करत पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारताची ऑरेंज अर्थव्यवस्था बनतेय जगासाठी कंटेट निर्माण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१ मे २०२५) मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी भारतातील चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटी आणि इतर कंटेंट निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी भारतात बनवलेल्या कंटेंटबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी कंटेंट निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल विस्तृतपणे सांगितले. पंतप्रधान मोदींनी नजीकच्या …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जण – बहुतेक नागरिक – मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. नवी दिल्ली येथील …

Read More »

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …

Read More »

पंतप्रधान मोदी मन की बात म्हणाले की, जो राग भारतीयांच्या मनात तोच राग जगात पहलगाम दशतवाद्यांना कठोरात कठोर उत्तर देणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ एप्रिल २०२५) त्यांच्या मासिक रेडिओ भाषणात ‘मन की बात’ मध्ये सांगितले. तीव्र दुःख व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुखावले आहे. “प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल तीव्र …

Read More »

बिलावल भुट्टो-झरदारी यांची दर्पोक्ती, सिंधू नदी आमचीच, एकतर पाणी नाहीतर रक्त वाहील भारताने सिंधू नदी करार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी दिला इशारा

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत सर्व व्हिसा रद्द केले. तसेच वाघा आणि अट्टारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पीपीपी पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी …

Read More »