पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या …
Read More »१३ लाख शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती. या मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ …
Read More »मोदी सरकारचा फतवाः अधिकाऱ्यांनो रथयात्रा काढा, काँग्रेसची टीका सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कामाचा प्रचार करण्याचे निर्देश
आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. देशभरातील प्रमुख राजकिय पक्ष निवडणूकीच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे मोदी सरकारमधील बहुसंख्य खासदार, मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही प्रचाराच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते विविध उपक्रमांचे …
Read More »राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्राची अभिनव संकल्पना, मुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे, ही बाब देखील …
Read More »जुलै महिन्यानंतरचा समृध्दी महामार्गावर सर्वात मोठा दुसरा अपघात ६ वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार- अपघाताला जबाबदार कोण?
साधारणतः जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर पहाटेच्यावेळी झालेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अपघात होवून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुन्हा समृध्दी महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलरमधील ६ वर्षाच्या चिमुकलीसह १२ …
Read More »केवळ या महिलांनाच मिळणार मातृ वंदना योजनेचा लाभ, जाणून घ्या अटी सुरक्षित मातृत्वासाठी ‘मातृ वंदना योजना 2.0’
दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची …
Read More »नव्याने लागू झालेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 नेमकी काय आहे? राज्यात लागू-मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची माहिती
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …
Read More »पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुम्हीही घरी आणू शकता किंमत १०० रुपयांपासून सुरू
अनेकदा तुम्ही पाहत आहात की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देशात किंवा परदेशात जातात तेव्हा त्यांना अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून मिळतात. यामध्ये चित्रे आणि स्मृतिचिन्हांसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. आता तुम्हाला पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुमच्या घरी आणण्याची संधी आहे. अशा ९१२ भेटवस्तूंचा लिलाव होत असून त्यांचा ई-लिलाव गांधी जयंती …
Read More »हरित क्रांतीचे प्रणेते डॉ एम एस स्वामीनाथन यांचे निधन देशाला अन्नधान्यात स्वावलंबी बनविणारे स्वामीनाथन यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारतात १९७२ चा दुष्काळ पडल्यानंतर देशावर अमेरिकेहून आयात केलेल्या गव्हाच्या धान्यावर गुजराण करण्याची परिस्थिती येऊन ठेपली होती. त्यावेळी देशातील पारंपारीक पीक पध्दतीत अनुलाग्र बदल घडवित शेतकऱ्यांची शेती उत्पादन कसे वाढेल या दृष्टीने देशात सुरु केलेल्या पहिल्या हरित क्रांतीचे सरसेनापती डॉ एम एस स्वामीनाथन आणि मुख्य नॉर्मन बरलॉग यांच्या प्रयत्नातून देशात …
Read More »
Marathi e-Batmya