राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन केले. या घटनेला आता जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही शिंदे गटाचे मंत्र्यांकडून आपले बंड कसे योग्य होते याचेच दाखले देत असून यापार्श्वभूमीवर जळगांवातील भोरखेडा येथील एका …
Read More »अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची खोचक टीका, गरजेल तो बरसेल काय यापेक्षा महाविकास आघाडीने मांडलेला अर्थसंकल्प चांगला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक टीका करत गरजेल तो बरसेल काय अशी टीका करत महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडले होते ते अभ्यासपूर्ण होते. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर का हलवा आहे …
Read More »उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय …
Read More »अजित पवारांचा आरोप, प्रत्येक आमदाराला मंत्री करतो म्हणून सांगितलं होतं पण… आमचं सरकार असताना सरसकट निधी वाढविला
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीतील कामांना सरकारने स्थगिती दिली. आमदारांनी सोबत यावे म्हणून आमदारांना मंत्रिपदाच आश्वासन दिले. त्यामुळे दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसल्याची खोचक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …
Read More »सुषमा अंधारेंचा खोचक टोला, त्यांनी बोंब मारली असेल तर आपण समजून घेऊ ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या सुखाची आणि मांगल्याची कामना
उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी शिंदे गटासह भाजपावर उध्दव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी १९ मार्चला उध्दव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचा इशारा दिला. यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना याबाबत विचारले असता त्या …
Read More »काँग्रेसने भूमिका स्पष्ट करताच संजय राऊत म्हणाले, उध्दव ठाकरे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा राहुल गांधी यांनी लंडनमधील आवाहनानंतर संजय राऊतांनी केली भूमिका जाहिर
सध्या परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आगामी २०२४ च्या निवडणूकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत लंडन येथील भारतीय पत्रकार संघटनेने घेतलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केले. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी जे सोबत येतील त्यांना घेऊन जाऊ अशी …
Read More »रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर पलटवार करत ठाकरेंना म्हणाले, १९ मार्चला उत्तर देणार भास्कर जाधव हा चिपळूनचा लांडगा
नुकतीच खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम हा ‘झपाटलेला’ सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला …
Read More »उध्दव ठाकरेंचा पलटवार, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला पण तुम्ही दिल्लीसमोर… चोर वृत्तीला मतदान करून नका
भाजपा आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांकडून कोरोना काळात उध्दव ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते अशी जहरी टीका सातत्याने करण्यात येत आहे. या टीकेला खेड मधील सभेत प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि …
Read More »उध्दव ठाकरेंची टीका, देशद्रोही बोलाल तर जीभ हासडून देईन, मग संगमांचं काय… खेडमधील जाहिर सभेत शिंदे गटाबरोबर भाजपावर साधला निशाणा
केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभेनिमित्त आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही विधानावरून चांगलाच दम …
Read More »महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावर शरद पवारांची स्पष्टोक्ती, निवडणूकीला सामोरे जाताना…. मी चर्चेत नसतो त्यामुळे मला माहित नाही
पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणूकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने कसबा मतदारसंघातील मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला. तर चिंचवडमधील मविआच्या उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा देण्याबाबत कोणीच विचारलं नसल्याचे थेट भाष्य करत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहिर केला. त्यानंतर वंचितने …
Read More »
Marathi e-Batmya