Tag Archives: uddhav thackeray

उध्दव ठाकरे यांच्या त्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, ‘बेगानी शादी में अब्दुला..’ चा पलटवार पोट निव़डणूक निकालानंतर उध्दव ठाकरेंनी टीका करत आता कसबा बाहेर आलाय देशही बाहेर येईल टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

तुम्ही पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीत प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला म्हणालात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारासाठी राज्याच्या इतिहासात रोड शो करण्याची घटना. पण तुम्हीही गल्लीबोळात फिरत होतात. तुमचे नेते शरद पवार हे ही छोट्या छोट्या मिटींगा घेत होते. ते ही गल्लीबोळातच फिरत होते ना असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार …

Read More »

चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काय दादा कालपर्यंत पोरं-टोर बोलत होते आता तुम्हीही… मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहेत असे म्हणायचं का?

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाले. त्यातील ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आरोपाचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टीपण्णी करत म्हणाले की, काय …

Read More »

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आल्यानंतर संजय राऊत म्हणाले, मी तुरुंगात गेलेला माणूस… हक्कभंग आणला तर मी माझं म्हणणं मांडेन

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी कोल्हापूरात बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यांच्या या विधानानंतर शिंदे-भाजपाने आक्रमक भूमिका घेत संजय राऊतां विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. तसेच सभागृहाच्या बाहेरही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत संजय राऊत यांच्यावर टीका केली. विधिमंडळात …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस सवाल, मग उध्दव ठाकरेही चोर मंडळाचे सदस्य ? विधान परिषदेत बोलताना फडणवीसांचा सवाल

संजय राऊतांनी आज कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. तसेच त्याचे पडसाद विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. विधान परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणे हे सहन करण्यासारखं नाही. …

Read More »

शिंदे गटाच्या युक्तीवादावर न्यायालयाचा सवाल, वेगळा गट नसताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश कसे दिले राजकिय पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेला सदस्यांनी पक्षाकडे मांडायला हवा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीचा आज चौथा दिवस होता. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवशी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आजही दुपारी एक वाजेपर्यंत सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेक झाल्यावर नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजी मांडण्यासाठी युक्तिवाद सुरू केला. …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा भरत गोगावले यांच्या प्रतोद निवडीलाच दिले आव्हान

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात अर्धवट राहिलेली सुनावणी आज सोमवारी २८ तारखेपासून पुन्हा सुरु झाली. आज ठाकरे गटाकडून काही मुद्दे राहिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत भरत गोगावले यांच्या प्रतोदच्या नियुक्तीला आव्हान …

Read More »

नारायण राणेंचा अजित पवारांना बारा वाजविण्याचा इशारा देत ठाकरेंच्या खोक्याची कॅसेट माझ्याकडे कसबा निवडणूकीवरून राणेंचा अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी करत, ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर …

Read More »

अजित दादांच्या त्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचा पलटवार, सकाळी शपथ तर संध्याकाळी कोणा… शेवटी जनता हुशार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली असून या निवडणूकीचा प्रचार संपताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांबाबत भविष्यवाणी करत …

Read More »

न्यायालयाच्या त्या प्रश्नावर कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणाले, त्यामुळे राजीनाम्याच्या गोष्टीला महत्व नाही सर्वच घटनात्मक संस्थांनी उल्लंघन केले

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी हे सध्या ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. या सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरेंचा राजीनामा कळीचा मुद्दा बनला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निरीक्षण नोंदवलं आहे. राजीनामा देण्याऐवजी उद्धव ठाकरे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे का गेला नाहीत? सरन्यायाधीशांच्या सवालावर ठाकरे गटाच्या वकीलांकडून जोरदार प्रतिवाद

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार असताना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सध्याच्या कायदेशीर लढाईत ही अडचणीचा मुद्दा ठरू शकतो अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. नेमक्याच मुद्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी घटनाक्रम सांगत असतानाच बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरे गेले असते, तर …

Read More »