Tag Archives: uddhav thackeray

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, …तेच घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले त्यातून लाखो नोकर्‍या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत...

सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. …

Read More »

भाजपाचा उमेदवार नसला तरी ऋतुजा लटके यांचा ‘या’ उमेदवारांशी सामना प्रचार संपला आता ३ तारखेला मतदान

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार आज मंगळवारी संध्याकाळी संपला. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर गुरूवारी मतदान होणार असून रविवार ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. अंधेरी पूर्व या एका पोटनिवडणुकीने राज्यातील राजकारण जोरदार तापले होते. उमेदवारी कोणाला इथपासून उमेदवार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट- शिंदे गटाशी संबधीत सुनावणीची तारीख ठरविणार

मागील चार महिन्यापासून राज्यातील सत्ता संघर्षावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगत २९ नोव्हेंबरपर्यंत उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांना आपले म्हणणे लिखित स्वरुपात सादर करण्याचे आदेश दिले. उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

बेळगावात मराठी भाषिकांसाठी मार खाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना सीमावासियांचा विसर ठाकरे सरकार असताना अनेक योजना मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सीमावासियांकडे पाठ

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित मविआ सरकारला उलथवून टाकले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी विधानसभेत बहुमत सिध्द करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जून्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, …

Read More »

भाजपा म्हणते, राज्याच्या बदनामीचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करून राज्याला मोठी भेट दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केली. शिंदे – फडणवीस सरकारच्या नेतृत्वात राज्यात येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेबरोबर गेलेल्या बच्चू कडू आणि नाणार संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य बच्चू कडू मी फोनवर सांगितल्यानंतर ते शिंदेसोबत गेले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदारांबरोबरच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आमदारांनाही सोबत नेले. यात बच्चू कडू यांचाही समावेश होता. मात्र बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कसे गेले याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नियोजित नाणार प्रकल्पाबाबतही महत्वाचे …

Read More »

भाजपा सवाल, औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी घेतली का?

मराठी माणसावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहतच औरंगजेब गाडला गेला, परागंदा झाला तेच औरंगजेबी अपुर्ण स्वप्न आज पुर्ण करण्याची जबाबदारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली आहे काय ? असा कडवा सवाल करीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी करत जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार ॲड …

Read More »

अरविंद सावंतांचा सवाल, निवडणूक आयोग बंद असताना त्या बातम्या कशा आल्या?

मागील तीन-चार दिवस दिवाळीची सुट्टी असताना सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ८.५० लाख प्रतिज्ञापत्रे फॉलमेटनुसार नसल्याने रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना …

Read More »

ऐन दिवाळीत ठाकरे गटाचे किर्तीकर आणि शिंदे गटाच्या कदम यांची भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण बाहेर पडले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत: ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ऐन दिवाळीची धामधुम …

Read More »

त्या चर्चेवर शिंदे गट म्हणतो, तुमच्याकडचे आमदार सांभाळा उध्दव ठाकरे गटावर साधला निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपली सत्ता कशी येईल याचे डावपेच आखत सत्तांतर घडवण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील आमदारांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. …

Read More »