खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित आहे. या निकाला नंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला निशाणा लक्ष करीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडयला सुरुवात झाली. तर दुसरीकडे न्यायालयाने संजय राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे ईडीवर ओढल्यानंतर ठाकरे गटाचे नेते …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या विजयानंतर ऋतुजा लटके मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट-भाजपा आणि उध्दव ठाकरे गटातील पहिली लिटमस टेस्ट अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पार पडली. या निवडणूकीत ६५ हजार मतांनी विजय मिळविल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या विजयी उमेदवार ऋतुजा लटके या मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळी उध्दव …
Read More »विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया: नोटाची मते भाजपाचीच…
शिवसेनेचे आमदार स्व. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणूकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा ६५ हजार मतांनी दणदणीत विजय झाला. मात्र या निवडणूकीत नोटाखाली मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. त्यामुळे लटके यांच्यानंतर दोन नंबरची मते नोटाला मिळाली आहेत. …
Read More »विजय झाला तरी पण उध्दव ठाकरेंसमोर खडतर आव्हाने
शिवसेनेतील फुटीनंतर पहिली लिटमस टेस्ट अर्थात अंधेरी पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजपाकडून मुर्जीत पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वास्तविक पाहता या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यात थेट सामना होईल अशी अटकळ बांधण्यात …
Read More »एकेरी वाटणारी पण नोटामुळे चुरसीच्या निवडणूकीत ऋतुजा लटके विजयी
अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता ही …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्ता हवी होती म्हणून परिवर्तन केलं नाही तर…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांना सुरुवातीला सूरत मध्ये आसरा देण्यात आला. तेथून हे सर्व जण भाजपाशासित आसाम आणि गोवा येथे गेले. त्यावेळी या फुटीमागे भाजपा नसल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र यामागे भाजपाच असल्याची चर्चा प्रसारमाध्यमात होती. या साऱ्या …
Read More »अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, …तेच घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले त्यातून लाखो नोकर्या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत...
सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. …
Read More »भाजपाचा उमेदवार नसला तरी ऋतुजा लटके यांचा ‘या’ उमेदवारांशी सामना प्रचार संपला आता ३ तारखेला मतदान
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार आज मंगळवारी संध्याकाळी संपला. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर गुरूवारी मतदान होणार असून रविवार ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. अंधेरी पूर्व या एका पोटनिवडणुकीने राज्यातील राजकारण जोरदार तापले होते. उमेदवारी कोणाला इथपासून उमेदवार …
Read More »सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट- शिंदे गटाशी संबधीत सुनावणीची तारीख ठरविणार
मागील चार महिन्यापासून राज्यातील सत्ता संघर्षावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगत २९ नोव्हेंबरपर्यंत उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांना आपले म्हणणे लिखित स्वरुपात सादर करण्याचे आदेश दिले. उध्दव ठाकरे यांच्या …
Read More »बेळगावात मराठी भाषिकांसाठी मार खाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना सीमावासियांचा विसर ठाकरे सरकार असताना अनेक योजना मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सीमावासियांकडे पाठ
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित मविआ सरकारला उलथवून टाकले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी विधानसभेत बहुमत सिध्द करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जून्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, …
Read More »
Marathi e-Batmya