Tag Archives: varsha gaikwad

सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय १५ टक्के फि कमी होणार-शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शाळांनी मनमानी पध्दतीने फि वाढवूनही त्यावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी खाजगी शाळांना फक्त इशारे देण्याचे काम करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर १५ टक्के फि कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत यासंदर्भात लवकरच शासन निर्णय जाहिर करण्यात …

Read More »

१० वी निकाल गोंधळानंतरही आता शालेय शिक्षण विभागाची ही वेबसाईट पडली बंद विद्यार्थी झाले हवालदिल ११ वी च्या प्रवेशासाठी अर्ज कसा भरायचा?

मुंबई: विशेष प्रतिनिधी नुकताच १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर ज्या वेबसाईटवरून निकाल जाहिर ती वेबसाईटच ५ ते ६ तास बंद पडल्याने विद्यार्थी-पालकांना सोसाव्या लागलेल्या मनस्तापानंतर आता ११ वी प्रवेशासाठी सीईटीची परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कालपासून बंद पडल्याची नवी माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण …

Read More »

१० वी निकाल गोंधळप्रकरणाची चौकशी हे अधिकारी करणार १५ दिवसात अहवाल सादर करण्याचा शासन निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात पहिल्यांदाच परिक्षा न देता केवळ मुल्यांकनाच्या आधारे १० वी विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर होणार होता. मात्र संकेतस्थळाच्या सर्व्हरवर लोड आल्याने तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे संकेतस्थळ उघडले जात नसल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आणि आनंदावर पाणी फेरावे लागल्याने या संपूर्ण गोंधळाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची नियुक्ती करणारा शासन …

Read More »

१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद

मुंबई: प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला टर्निंग पाँईट देणारे दरवर्षी १० वी आणि १२ वीचा परिक्षेचा निकाल जाहीर दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने जाहीर होतात. मात्र गेल्या काही काळात या दोन्ही परिक्षेचा निकाल जाहिर होण्याच्या वेळेपासून चार तास, पाच तास संकेतस्थळच हॅग होण्याचे प्रकार वाढीला लागल्याने उत्सुकते आणि अधिरपणे १० वी चा निकाल पाहण्यासाठी …

Read More »

शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून बसले भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात केली खरी, परंतु महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प …

Read More »

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने सायकल प्रवास करत राज्यपालांना दिले निवेदन इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरिब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेला आहे. इंधनावरील कराच्या रुपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडले असून मोदी सरकार …

Read More »

शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या शिक्षण धोरणा संबंधित वारंवार कानउघडणी करून सुद्धा त्याकडे सपशेल कानाडोळा करीत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडत राज्याची शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. राज्य सरकारने तातडीने शुल्क निश्चिती करून शाळांना चाप लावावा, अशी मागणीही त्यांनी …

Read More »

बेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे रखडलेल्या प्रत्येक विभागातील भर्ती प्रक्रियेला हळुहळू सुरुवात होत असून सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली. त्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे …

Read More »

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मार्क या पध्दतीने ; शासन निर्णय जारी १० वी, ११ वीचे मार्कावरून मिळणार १२ वीला गुण

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिक्षा न घेता मुल्यांकन कसे होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनाही होती. त्यानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी १० आणि ११ वी परिक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येणार …

Read More »

फि भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचा हक्क डावलणाऱ्या शाळांवर होणार ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून अनेक शाळांकडून फि भरली नाही म्हणून ऑनलाईन शाळेच्या वर्गाला प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. त्याविरोधात पालकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करत कडक कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला आज दिल्याची …

Read More »